दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी कवि -सरकार इ़ंगळी
पंचगंगा नदी काठावर असणारे इ़ंगळी गांव.दरवर्षीच्या महापूराने इंगळीतील शेतकऱ्यांचे प्रंचड प्रमाणात शेतीचे नुकसान होते.गावापासून ४कि. मी.रस्ता अत्यंत खाच खळग्याचा बनला आहे.
इ़ंगळी चंदूर पानंद रोड लगत अर्धा कि.मी.अंतरावर लोकवर्गणीतून भव्य असे चाबुकस्वार दर्गा मंदिर बांधले आहे .परंतू सदर मंदिराकडे जाण्यासाठी पानंद रस्ता फार पूर्वीपासून होता.त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ऊस शेती असल्याने कधी रस्त्याची अडचण भासली नव्हती. परंतू गेली काही वर्षात काही शेतकरी यांनी अतिक्रमण कले आहे.आता सहकारी साखर कारखाने सुरू होणार असलेने ऊस वाहतुक कशी करायची या विवंचणेत शेतकरी आहेत.
काही शेतकरी यांनी आपले रानात रस्ता आहे म्हणून रस्ता नांगरले आहेत तर काही शेतकऱ्यांनी रस्त्यावरच चर मारले आहेत.त्यामुळे चाबुकस्वर मंदिराकडे जाता येत नाही.शेतकऱ्यांना रासायनिक खते नेता येत नाहीत.
चार पाच महिन्या पूरवी गावाती २००नांगरीकांच्या सह्यांचे निवेदन अप्पर तहसिलदार मा .शरद पाटील इचलकरंजी यांना दिले होते.त्यामुळे ते स्व.ता येऊन प्रत्यक्ष सदर पानंद रस्त्याची पहाणी करून ,अतिक्रमण केलेल्या,रस्ता नांगरलेल्या, चर मारलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे फोटो ही काढून नेले होते.पण चार पाच महिने झाले कार्यवाही दिसत नाही.ज्या नागरीकांनी निवेदन दिले त्यांच्याकडून अशी माहिती मिळते की तहसिलदार यांनी भूमि अभिलेख यांचेकडे रस्ता नकाशासाठी मागणी केलेली आहे.
रस्ता अतिक्रण झालेला आहे.शेतकरी वर्ग, चाबुकस्वर भक्त यांना रस्ता नसलेने फार मोठी अडचण झाली आहे.लोकप्रतिनिधी पण लक्ष घालून पानंद रस्त्याची अडचण मार्गी लावत नाही.
मान.नामदार. चंद्रकांतदादा पाटील तंत्र व शिक्षण, वस्त्रउधोग मंत्री,महाराष्ट्र राज्य.हे कोल्हापूरचे रहिवाशी आहेत शिवाय कोल्हापूर जिल्हयाचे नेते आहेत.त्यामुळे त्यांनी स्व.ता लक्ष घालून चाबुकस्वार दर्गा पानंद रोड अतिक्रमणच्या विळख्यातून मुक्त करावा व शेतकरी व चाबुकस्वार दर्गा येथे अनेक दूरवरच्या गावातून येणाऱ्या भक्त,नागरीक यांना रस्ता मार्गी लावून सोय करावी.अशी नागरीकातून हि मागणी हैत आहे.