दैनिक चालु वार्ता आष्टी प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा)प्रतिनिधी:भारत ही संतांची भूमी आहे. वेदपरंपरेच्या विरोधात चार्वाक परंपरेचा उदय झाला आणि कर्मकांडांच्या विरोधात संताची विचारधारा उभी राहिली असे प्रखर विचार कन्नमवारग्राम येथील शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्राची संत परंपरा व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती वर्धा महिला संघटीका डॉ.प्रा.सुचिता ठाकरे यांनी कन्नमवारग्राम तालुका कारंजा(घा) येथील आयोजित कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले याप्रसंगी सरपंच
ईश्वरीताई येवले,पोलीस पाटील राजू चोबे,सत्यनिष्ठ बहुउद्देशीय संस्था सदस्य राम हाडके,निलेश पाटीलपैक,नेहरू युवा केंद्राचे जगदीश खडसे,ग्रा.पं.सदस्य प्रज्ञा फडफड,चंदा धुर्वे,संगीता बेले,निकिता वाघधरे,भास्कर मारबते, किसना वरठी, नितीन ठाकरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते पुढे बोलताना डॉ.ठाकरे म्हणाल्या की, याच संत विचारांचा वारसा पुढे संत रविदास तसेच संत कबीर यांनी चालविला. संत कबीरांनी समाजातील वाईट चालीरिती रूढी प्रथा परंपरा यावर जोरदार शाब्दिक हल्ले केले. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत सावता माळी, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत बहिणाबाई आणि त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले. पुढे थोर समाजसुधारक शाहू, फुले, आंबेडकर यांनी समाज प्रबोधनाचा हाच वारसा चालवीला. खऱ्या संतांनी कधीही चमत्कार केले नाही व चमत्काराचे समर्थनही केले नाही परंतु याच संतांच्या माथी आपण त्यांच्या पोथ्या लिहून चमत्कार मारले. समाजातील विषमतेवर, वाईट प्रथा परंपरांवर आपल्या लेखणीने व वाणीने प्रहार करणाऱ्या संतांनी समाजाला दैववादाकडून बुद्धी प्रामाण्यवादा कडे नेण्याचा कसोशीने प्रयत्न केला या जगात कोणीही चमत्कार करू शकत नाही कुणाच्याही अंगात दैवी शक्ती संचार करू शकत नाही, जादूटोणा, करणी, मंत्र तंत्र करून कोणीही कुणाचेही नुकसान करू शकत नाही असे असताना आणि जर कुणी चमत्कार करण्याचा दावा करत असेल तर महाराष्ट्रामध्ये जादूटोणाविरोधी कायदा लागू झालेला असून, त्या व्यक्तीला कमीत कमी सहा महिने ते सात वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते याची माहिती सुचिता ठाकरे यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी अनेक वैज्ञानिक प्रयोग देखील करून दाखवले व प्रत्येक चमत्काराच्या मागे एक तर हातचालाखी किंवा रासायनिक प्रयोगांचा वापर करून असे प्रयोग केले जातात याची ही माहिती डॉ.ठाकरे यांनी याप्रसंगी दिली. याच कार्यक्रमात सागर लाखे व प्रांजली सामाजिक संस्थां चिस्तुर च्या वतीने पथनाट्याचे सादरीकरण केले शिवरायांवरील पोवाडा सादर करून सर्वांची मने जिंकली. अंधश्रद्धा निर्मूलन, हागणदारी मुक्त गाव या दोन विषयावर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश पाटीलपैक यांनी केले तर आभार प्रदर्शन सरपंच ईश्वरी येवले यांनी मानले.