दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर उपसंपादक -मोहन आखाडे
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णय राज्य आणि केंद्र सरकराने घेतला आहे. मात्र आता या निर्णयाला विरोध देखील होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर इम्तियाज जलील यांच्यासह शेकडो नागरिकांनी साखळी उपोषणाला सुरवात झाली आहे. यावेळी ‘आय लव औरंगाबाद’ नावाचे फलक घेऊन अनेकजण या उपोषणात सहभागी झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान राजकारणासाठी शहराचे नाव बदलण्यात आल्याचा आरोप जलील यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान साडेबारा वाजेच्या सुमारास जलील हे उपोषणास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांच्यासह एमआयएमचे अनेक पदाधिकारी देखील याठिकाणी उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. सोबतच अनेक वेगवेगळ्या राजकीय संघटनांनी देखील या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या समोर या साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वरिष्ठ अधिकारी देखील उपोषणाच्या ठिकाणी उपस्थित असल्याचे समोर आले आहे. तर हे साखळी उपोषण कधीपर्यंत येईल, याबाबत सांगता येणार नसल्याचं जलील म्हणाले आहे.