दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- वीरशैव कंकय्या चर्मकार समाज विकास संस्था अमरावती यांच्या वतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम शितला माता मंदिर चौक महाजनपुरा येथे आयोजित करण्यात आला होता.प्रथमत: शिव जयंतीच्या पर्वावर हर्ष आनंद आमले या मुलाने शिवगर्जना म्हणून कार्यक्रमाची सुरवात केली.तसेच यावेळी छ.शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने सर्व मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून लाडू वाटप करण्यात आले.
तर या कार्यक्रमाला खोलापुरी गेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तामटे तर उपनिरीक्षक आकाश महल्ले,सहाय्यक उपनिरीक्षक दिलीप नांदूरकर हे प्रमुख उपस्थिती म्हणून विराजमान होते.शेतकरी संघटनेचे जिल्हा संयोजक आनंद आमले,जिल्हा संघटक सचिन वाटकर,युवा स्वाभिमान पार्टीचे प्रवक्ता गणेश गायकवाड,माजी नगरसेवक भारत चव्हाण,राजू बोरकर,युवा स्वाभिमान पार्टीचे शहर उपाध्यक्ष प्रवीण मोकळे यांनी विशेष उपस्थिती दर्शविली.
यावेळी वासुदेवराव कोठेकर,देवदासजी मेशकर, गायकवाड,भारत कोठार,राजू चव्हाण,रमेश डांगे,संजय ठाकूर,श्याम शाहू,प्रकाश ठाकूर,राजू बोरकर,अरुण चव्हाण,किशोर कोठेकर,प्रदीप पिढेकर,रामाजी उज्जैनकर,सुनील सावरकर,नरेश घोरे,अनिल सावरकर,कैलास पिढेकर,भारत गणेशकर,प्रवीण सावरकर,अरुण विजयकर,नरेश सावरकर,प्रमोद वाटकर,अभय काळबांडे,अजिंक्य सावरकर,पिंटू विजयकर,गणेश मेशकर,हनुमंता विजयकर,रवींद्र उज्जैनकर,शेखर गायकवाड,पंकज कोठेकर,सारंग वाटकर,राजेश सावरकर,संजय गणेशकर,बाल्या विजयकर,धनराज नांदूरकर,धीरज अर्जापुरे,नाना सावरकर,दिनेश वाटकर,महादेव गायकवाड,रामेश्वर सावरकर,राजकुमार गडलिंग,उमेश सावरकर,चंद्रपाल शाहू,चेतन नांदूरकर,पुरुषोत्तम गायकवाड,राजकुमार दुर्योधन,सागर वाटकर,दुर्गेश गणेशकर,सागर सावरकर,मोंटू वाटकर,मोहन विजयकर,नाना सावरकर,संतोष पिढेकर,अनंत वाटकर,विजय डी.सावरकर,गोपाल गायकवाड,कैलास विजयकर,सागर बोरकर,रोहित सावरकर,छत्रपती चव्हाण,बाल्या रावेकर,योगेश पिढेकर,जय सावरकर,जीवन विजयकर,मंगेश विजयकर,शुभम गायकवाड आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————
रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अंगीकृत करणे हीच खरी शिव जयंती असून त्यांनी लहान वयातच स्वराज्य निर्माण करण्याचे मोठे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी त्यांनी अनेक जीवास जीव देणारे मावळे तयार केले.त्यांना डोक्यावर नाहीतर डोक्यात त्याचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे.त्यांना जाती धर्मात बंदिस्त न करता त्यांच्या त्याग आणि संघर्षाचा युवा पिढीने अभ्यास करायला हवा.
– गजानन तामटे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याला तोड नाही.इतिहासाच्या पानावर त्यांनी आपले नाव कोरले.जाती-धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणूस म्हणून जगायला शिकविणारे राज्य महाराजांनी निर्माण केले.शिवरायांची रणनिती,त्यागभावना,गनिमी कावा,राजकारण-समाजकारण यांचा सुरेख मिलाफ स्वराज्यामध्ये घातला.
– गणेश गायकवाड
प्रवक्ता,युवा स्वाभिमान पार्टी