दैनिक चालु वार्ता आष्टी प्रतिनीधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) : स्थानिक जनशक्ती संघटनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाला २४ तासाच्या आत आष्टी व तळेगाव (श्या.पंत) येथील ३४७ ए या महामार्गावरील कठडे काढण्यासाठी अल्टिमेट दिला होता तेव्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यकारी अभियंता कथलकर व उपकार्यकारी अभियंता पणपालिया यांनी २४ तास अल्टिमेट निवेदनाची दखल घेतली आणि तात्काळ आर.आर. सी.महामार्ग कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आज जनशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लोखंडी कठडे काढायला सुरूवात केल्याची बातमी पुढे आली आहे त्यामुळे महामार्ग वरील कठडेग्रस्त नागरिक व वाहन चालकासह नागरिकात जनशक्ती संघटनेचा उदो उदो होत असून आनंद व्यक्त केल्या जात आहे कठड्यामुळे बसवल्यापासून ५० ते ५२ अपघात झाले असून त्यात १० ते १२ नागरिकांचा अपघातात बळी गेला आहे तर काही गंभीर जखमी होवून अत्यावस्थ झाले त्या कारणे नागरिकात महामार्ग प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला होता तश्या तक्रारी जनशक्ती संघटनेकडे प्राप्त झाल्या होत्या त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत जनशक्ती संघटनेचे सर्वेसर्वा मकरंद देशमुख, आनंद निंबेकर,आष्टी न.प. उपाध्यक्ष जनाब झाकीर हुसेन, नगरसेवक रामकृष्ण सुरजुसे, नगरसेवक रेहान कुरेशी, नगरसेवक नासीर शेख, ग्रा.पं.पेठ अहमदपूर सरपंच शेख युसुफ, योगेश सोनटक्के कार्यकर्ते राजेश ठाकरे, अनिरुद्ध दंडाळे, पवन गुल्हाने, चंदू सत्पाळ, विजय गंजीवाले, संजय जाणे, रशीद खा, सोहेल खान, सचिन ढोके, किशोर इंगळे, सादिक खान, वैभव चातुरकर, वैभव मेंढे, संजय एकोतखाने विक्की माहोरे, राजेश माहोरे, राहुल सावरकर आदी कार्यकर्ते यावेळी हजर होते