दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- कवी सरकार .इंगळी.
इंगळी ते चंदूर हा ४ कि.मी.अंतराचा रस्ता असून
सदरचा रस्ता २०वर्षापूर्वी डांबरीकरण झाला होता.पण हा रस्ता रानातून जात असलेने काळवट जमीन असल्यामुळें रस्ता काही वर्षातचं खराब झाला होता. पण पुन्हा त्या रस्त्याचे दूरूस्तीकरण झालेले नाही.
गावापासून चंदूर पंचग़गा नदीप्रर्यंत असणारे रस्त्यावरती हजारो एकर शेती आहे.गावातील अनेक शेतकरी जनावरे बांधणेकरीता वस्ती मांडली आहेत.रस्ता अंत्यंत खाच खळगेचा बनला असून लोकप्रतिनिधींना वारंवार सांगून देखिल दूर्लक्ष होत आहे.२०वर्षात ४ वेळा खासदार,आमदार निवडून आले.पण अजून रस्ता काय होत नाही.
सदर रस्त्यावर हजारो शेतकरी रोज शेतात कामानिमित्य जातात.शेकडो महिला वर्ग ,पुरूष मंडळी मोलमजूरी करणे करीता जातात.जनावरांनां चारा आणणेसाठी सकाळ,सांयकाळ जातात.शेतीसाठी रात्रीअपरात्री पाणी सोडणेसाठी जावे लागते.त्यामुळें शेतकरी वर्गाचे अतोनात हाल होत आहे.सकाळी महिलांना जनावराचे दूध काढणे साठी अशा खाच खळग्यातील रस्त्याने जात असताना खूप हाल होत आहे.आता पावसाळापासून दिवाळी प्रर्यंत रस्त्यावरच्या खड्यात पाणी साचलेले असते.दिवाळी नंतर सहकारी साखर कारखाना सुरू झाले की,ऊस वहातूक करताना वाहन धारकांना वाहन चालवतांना मोठी कसरत करावी लागते.
या मतदार संघातून निवडून गेलेले खासदार,आमदार यांनी लक्ष घालून तातडीने रस्ता करावा अशी मागणी नागरीकातून वारवांर होत आहे.
आज मात्र एवढं नक्की ,काय रस्ता,काय खड्डे,काय पाणी,ओकेचं हाय,असम्हणायचं का?.हा प्रश्न प्रत्येक त्या रस्त्यांवरून जाणाऱ्या नागरीकांना पडत आहेत.