दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : देशात पेट्रोल बंदीची कल्पनाही सामान्य माणूस करू शकत नाही, पण येत्या 5 वर्षात देशात पेट्रोलवर बंदी येईल आणि देशात त्याची गरज भासणार नाही, असा दावा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
देशात पेट्रोलला स्वस्त पर्याय मिळाल्यास सर्वसामान्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.
अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या 36 व्या दीक्षांत समारंभात गुरुवारी बोलताना गडकरी यांनी आगामी काळात देशात पेट्रोलवर बंदी घालण्यात येणार असल्याचा दावा केला. यावेळी कृषी विद्यापीठाने गडकरींना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवीही प्रदान केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंग कोश्यारी होते.
शेतकर्यांनी व्हावे ऊर्जा प्रदाता
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, आता विदर्भात बनवलेले बायो-इथेनॉल वाहनांमध्ये वापरले जात आहे. ग्रीन हायड्रोजनची निर्मिती विहिरीच्या पाण्यापासून करता येते आणि ते 70 रुपये किलो दराने विकता येते.
ते म्हणाले की, येत्या पाच वर्षांत देशात पेट्रोल संपेल. केवळ गहू, तांदूळ, मका आदी पारंपरिक पिके घेऊन शेतकर्याचे भविष्य उज्ज्वल होऊ शकत नाही. आता शेतकर्याला काही तरी वेगळे करावे लागेल. गडकरी म्हणाले की, शेतकर्यांनी आता अन्नदात्यासह ऊर्जा दाता बनण्याची गरज आहे.
इथेनॉल आहे बचतीचे भांडार
गडकरी म्हणाले की, इथेनॉलच्या एका निर्णयामुळे देशाची 20,000 कोटी रुपयांची बचत झाली आहे.
नजीकच्या काळात दुचाकी आणि चारचाकी वाहने ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल आणि सीएनजीवर आधारित असतील.
केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, विदर्भातून बांगलादेशात कापूस निर्यात करण्याची योजना आहे,
ज्यासाठी विद्यापीठांचे सहकार्य आवश्यक आहे.
विदर्भातील शेतकर्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विद्यापीठे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.