दैनिक चालु वार्ता
पालघर मोखाडा
प्रतिनिधी:-अनंता टोपले
स्थानिक पातळीवर रोजगार नसल्याने
लहु त्र्यंबक भगरे रा वारघड पाडा यांची साडेतीन वर्षांची मुलगी अनुष्का हिचा ताप आल्याने मृत्यू.
लहु हे मंजुरीसाठी पडघा येथे गेले होते
तिथे अनुष्का हिला ताप आला तिला पडघा येथे दवाखान्यात दाखल केले,तेथुन भिवंडी येथे हलविण्यात आले पण आले पण तिचा दुर्दैवी निधन झाले आहे.
सदर कुटुंबांची श्री प्रदीप वाघ सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र घाणे य
यांनी भेट घेतली व घडलेल्या घटना खुपच गंभीर असून वारंवार आदिवासी समाजातील मजुरांवर दुर्दवी घटना घडत आहेत, दोन आठवड्यात दोन कुंटबांची मजुरी, रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतर झाले व बालकांचा मृत्यू झाला आहे.
तरी या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे असे मत श्री प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.