दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे.
राज्यापाल कोश्यारींच्या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळातील नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली. ‘राज्यपाल कोश्यारी यांची वक्तव्य बघितल्यावर महाराष्ट्राच्या नशिबी अशी माणसं का येतात’, अशा सवाल उद्धव ठाकरे यांच्याकडून उपस्थित करत कोश्यारींवर निशाणा साधला.
ठाकरे पुढे म्हणाले, ‘आज त्यांनी कहर केला आहे. त्यांची भाषणे मुंबईतून येतात की दिल्लीतून येतात हा संशोधनाचा विषय आहे. राज्यपालांनी डोंगर,गड-किल्ले, पैठणी खाद्यपदार्थ आहेत. हे त्यांनी गेल्या दोन-अडीच वर्षात पाहिलेले असतील. मात्र, त्यांनी कोल्हापूरचा जोडा पाहिलेला नाही. त्यामुळे राज्यपालांना जोडा दाखविण्याची गरज आहे, अशा शब्दात ठाकरे यांनी राज्यपालांवर हल्लाबोल केला.