दैनिक चालू वार्ता /
जालना जिल्हा प्रतिनिधी /
नितिन भदर्गे
सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशाशातून खाद्यपदार्थ विक्रेत्यांना बंधनकारक केले आहे की त्यांनी बनवलेल्या खाद्यपदार्थांची अंतिम तारीख त्यांनी दर्शनी भागात व खाद्यपदार्थांच्या विष्ठणावर लिहिणे हे बंधनकारक आहे. परंतु परतूर शहरात या आदेशासह विविध शासकीय नियमांचे उल्लंघन करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. परतुर शहरात मिठाई विक्रेते, हॉटेलचालक तयार केलेली मिठाई, चिवडा, विविध तळलेले पदार्थ, पेय पदार्थ, पनीर, दही, लस्सी, श्रीखंड, पेढे, कलाकंद सारखे एक ते दोन दिवसात नाशवंत होणारे पदार्थ हे त्यांची तयार केलेल्या दिवसाची तारीख व वापराची अंतिम तारीख न लिहिता सर्रास विक्री करत आहेत. त्यामुळे अनेक वेळा नागरिकांना असे पदार्थ खाण्यामुळे आरोग्यसंबंधी विविध तक्रारी उद्भवत आहेत. परंतु याकडे अन्न व औषध विभाग तसेच नगर परिषदेचा आरोग्य विभाग अर्थपूर्ण संबंधातून डोळेझाक करत आहे. असा आरोप शहरातील विविध जागरूक नागरिकांनी केला आहे .शहरात अन्य खाद्यपदार्थ विक्रेते हे नोंदणीकृत नाहीत तर जे आहेत त्यांना नियम माहीत नाही खाद्यपदार्थ विक्री करताना आवश्यक अशी खबरदारी राखताना कोणताही विक्रेत्यांनी दर्शक निदर्शनास येत नाही. खाद्यपदार्थ विक्रेत्यांननी केसांना पूर्णपणे कव्हर केले पाहिजे. हाताला विशिष्ट प्रकारचे ग्लोज तर तोंडाला मास्क चा वापर केला पाहिजे परंतु शहर व परिसरात मिठाई विक्रेते, दूध विक्रेते,जलीबी विक्रेते, पनीर विक्रेते, यांच्याकडून नियमाची पायमल्ली करून सर्रास विक्री केली जात आहे याकडे अन्न व औषध प्रशासन आणि नगरपरिषद अक्षम्य डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.