दैनिक चालू वार्ता परतूर प्रतिनिधी -नामदेव तौर
परतूर :तालुक्यातील हातडी येथील लघु तलावाच्या सांडव्याचा दरवाजा तलावाच्या मागील 2 वर्षा पासून गायप झाला आहे. गेल्या वर्षीपासून पाटबंधारे विभागाचा पाठवा करूनही अध्यापित पाटबंधारे विभागाने काम पूर्णन केल्यामुळे सध्या तलावाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने येत्या काही दिवसांमध्ये तलाव कोरडा पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे पाटबंधारे विभागाने माहिती असताना ही दुर्लक्ष केले आहे.
तालुक्यातील हातडी, दैठणा व येणोरा शिवारातील शेतकऱ्यांची जवळपास १२ से हेक्टर जमीन हातडी येथील लघु तलावात गेलेली आहे. असे असतानाही शेतकऱ्यांना तलावाचा काहीच उपयोग होत नाही.
शेतकऱ्यांनी बागायती पिकांची लागवड केली आहे. तसेच या तलावावर हातडी, दैठना गावचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. मात्र, हा तलाव
पावसाळ्यात भरण्या ऐवजी दरवाजा नसल्याने रिकामा होत आहे. वेळीच याकडे पाटबंधारे विभागाने लक्ष देऊन तलावाच्या सांडव्यावर गेट बसविण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
तलावात पाणी साठा होत नसल्याने भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी वेळीच पाटबंधारे विभागाने साडव्या वरील दरवाजा बसण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे..