दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी-
लोहा तालुक्यातील मौजे दापशेड येथे नापिकीला कंटाळून शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
लोहा तालुक्यातील मौजे दापशेड येथील शेतकरी पांडुरंग धोंडीबा मोरे वय ५५ वर्ष या शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले व कर्जबाजारी झाल्यामुळे आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
अशी माहिती दापशेडचे सरपंच प्र. विरभद्र राजुरे यांनी दिली असून आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शासनाने मदत करावी अशी मागणी सरपंच विरभद्र राजुरे यांनी केली आहे.