दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
दोन वर्ष होईपर्यंत स्तनपान करणे बालकाला लाभदायक
जव्हार-:जव्हार तालुक्यातील ग्रामीण तथा अति दुर्गम भागामध्ये तालुका आरोग्य अधिकारी यंत्रणे कडून गरोदर माता,स्तनदा माता व लहान बालके याकरिता चांगल्या प्रकारे उपाय योजना सुरू असल्याने अज्ञानाचे रूपांतर ज्ञानात होऊन ग्रामीण भागात भगतगिरी,अंधश्रद्धा सोडून आता आशा कार्यकर्ती,आरोग्य सेविका व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच रुग्णालयांच्या माध्यमातून नेहमीच आईचे दूध हे बालकांसाठी वरदान असल्याने बालकला जन्मा पासून ते दोन वर्ष होईपर्यंत सुदृढ व निरोगी बाळ राहण्यासाठी मातेचे दूध हेच पूर्णान्न असल्याने स्तनपान करणे बालकाला देखील लाभदायक ठरत आहे.
आईचं दूध हे बाळासाठी अमृत आहे.मात्र बदलती जीवनशैली,शरीराला जपण्याची असलेली स्पर्धा,करिअर यामुळे काही माता बाळाला स्तनपान करण्यास उत्सुक नसतात.बाळाला सहा महिन्यांपर्यंत केवळ आईचे दूधच हा पौष्टिक आहार असतो.त्यामुळे स्तनपान करून बाळाला सुदृढ ठेवणे महत्त्वाचे आहे.
आई आणि बाळ यांचे नाते अधिक सक्षम करण्याचे काम आईचे दूध करते.प्रसूतिपश्चात काही कारणाने जर एखाद्या महिलेला नैराश्य आले असेल तर स्तनपान केल्याने हे नैराश्य कमी होते.आईच्या दुधामध्ये विविध प्रकारची प्रतिजैविके असतात.त्यामुळे बाळाला विविध प्रकारे होऊ शकणाऱ्या संसर्गापासून सुरक्षा मिळते.दूध ही बाळासाठी पहिली रोगप्रतिबंधक लस आहे.शारीरिक,मानसिक क्षमता वाढण्यास मदत मिळते.स्तनपान केल्याने गरोदरपणात वाढलेले वजन कमी होते. प्रसूतीनंतर होणारा अतिरिक्त रक्तस्राव कमी होतो.लगेच गर्भधारणा राहण्याची शक्यता कमी असते.स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते.
चिक दुधाचे बालकांसाठी महत्व
बाळाचा जन्म झाल्यानंतर लगेच स्तनपान करायला पाहिजे.यामुळे दीर्घकाळपर्यंत स्तनपान सुरू रोगप्रतिबंधक म्हणूनही त्याचा उपयोग होतो.स्तनपानामुळे बाळाचे योग्य रीतीने पोट भरते.दूध ओढावे लागत असल्याने बाळाच्या क्रियाही गतिशील होते.तालुक्यातील अल्पवयीन मातांचे प्रमाण देखील दिवसेंदिवस कमी होत असून,आरोग्यविभाग,सामाजिक संस्था व शिक्षणाच्या माध्यमातून माता व बालकाची काळजी घेणे आता जबाबदारी म्हणून पार पडली जात असल्याचे दिसून येत आहे.
आई आणि बाळाचे नाते स्तनपानामुळे अधिक घट्ट होते. आईचे दूध निर्जंतुक असते.त्यामुळेच बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.त्याचा लाभ मुलांना भावी आयुष्यात होतो.विविध आजारापासून बाळाच संरक्षण होते.बाळ जितके जास्त दूध पिणार तेवढे दूध निर्माण होते. त्यामुळे मातांना निसंकोचपणे बाळाला दूध पाजायलाच हवे. यामुळे बाळाचे आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते.
डॉ.भरत कुमार महाले,स्त्रीरोगतज्ज्ञ,पतंग शहा उपजिल्हा रुग्णालय,जव्हार