दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली. दोघांमध्ये एक तासभर चर्चा झाली.
या भेटीमुळे महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राज्यातील सत्तासंघर्ष आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व आहे.मुंबई मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली.
दोघांमध्ये एक तासभर चर्चा झाली. या भेटीमुळे राज्यात पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्रात सुरू असलेला अभुतपूर्व सत्तासंघर्ष आणि होऊ घातलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका यामुळे या भेटीला विशेष राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.मुंबई मनपा निवडणूक आणि राज्यातला सत्तासंघर्ष लवकरच मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडत आहे. त्यातचं मनसे पक्षाने हिंदूत्वाचा मुद्दा अलीकडे उचलून धरला आहे. भाजपसोबत राज ठाकरेंच सख्य वाढतच चाललं आहे.
यामुळेच, भाजप मनसे युती होणार की काय असा प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित राहिला आहे. भविष्यात शिंदे गट जर एखाद्या राजकीय पक्षात विलीन करण्याची वेळ आली, तर मनसे हा उत्तम पर्याय ठरू शकतो, अस राजकीय जाणकारांच म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व आहे.