दैनिक चालू वार्ता लोहा प्रतिनिधी -राम कराळे .
लोहा कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ तर कधी नापिकी अशा अनेक नैसर्गिक संकटाचा सामना शेतकरी करत असतो. अशातच मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातील सोयाबीन पिकाला गेल्या विस ते पंचवीस दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने जबर फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पिकाच शंबर टक्के नुकसान झाल्याच्या चर्चा शेतकरी वर्गातून ऐकायला येत आहेत.
एकीकडे आसमानी संकटात
सापडलेला शेतकरी शासनस्तरावर याची दखल घेतली जावी या आपेक्षेत असताना राज्य सरकार दसरा मेळावा कोण भरवणार यातच मशगुल दिसत आहे. रोजच सोयाबीनचे कमी होणारे भाव शेतकर् यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. गेल्या वर्षी लावलेली वायदे बंदी या वर्षी कायम ठेवण्याची सोपाने केलेली मागणी अत्यंत चुकीची आणि शेतकरी विरोधी आहे. याचा कुठेतरी विचार व्हायला पाहिजे. पिक उत्पादनात वाढलेला खर्च वजा नफा हे सूत्र लक्षात न घेता भाव पातळी खाली आणनं धोकादायक आणि शेतकरी विरोधी आहे. आजघडीला सुरूवातीला झालेली अतिवृष्टी आणि आता पडलेला पावसातील मोठा खंड यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याच चित्र वेदनादायक आहे. याची दखल घेऊन, शासनस्तरावर युद्धपातळीवर पिकांचे पंचनामे होऊन, लवकरच मदत मिळायला पाहिजे.अशी मागणी तालुक्यातील प्रगतशील शेतकरी रत्नाकर पाटील सायाळकर व गोविंद पाटील जामगे पेनूर येथील प्रगत शेतकरी ज्ञानेश्वर गवते यांनी शासनाकडे केली आहे.