दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : शहराचे आरोग्य कायम निरोगी ठेवायचे असेल तर स्वच्छता ही अत्यंत आवश्यक असते. नाल्या व गटारांद्वारे वाहिले जाणारे घाण व नैसर्गिक पाणी योग्य रितीने आणि योग्य त्या प्रवाहाने विसर्ग होणे गरजेचे असते. त्याशिवाय शहरांतील घराघरांतून व गल्ली बोळातून जमा होणाऱ्या कचऱ्याचे सुका व ओला असे विलगीकरण करुन तो नियमितपणे उचलला जाणे महत्वाचे असते. अगदी रोजच्या रोज जराही खंड न पाडता तो ज्या वाहनांतून घनकचरा प्रकल्पावर पोहोचविला जातो, अगदी तेथपर्यंत त्या वाहनांवर ती झाकून (बंदीस्त) तो नेला गेला पाहिजे. त्यानंतर घ्यावी लागणारी सर्वोत्तम काळजी म्हणजे कचरा साठवणी प्रकल्पावर. प्रामुख्याने ओला, सुका असे नियमित विलगीकरण, औषध फवारणी किंवा स्वच्छतेसाठी जे जे करणे आवश्यक आहे, ते ते सर्व वेळेच्या वेळी होणे आवश्यक असते. या व अशा प्रकारची काळजी घेणे, त्याचे नियोजन करणे, व्यवस्था व देखभाल करणे या सर्व बाबींवर तृप्ती सांडभोर यांचा आयुक्त म्हणून परिपूर्ण कटाक्ष असल्याचे दिसून येत आहे. कार्यालयीन कामकाजाचा गाडा हाकणे जसे महत्वाचे आहे किंबहुना त्याहीपेक्षा अधिक महत्वाचा भाग म्हणजे शहराचे आरोग्य निरोगी राखणे, स्वच्छ, नियमित व पुरेपूर असा पाणी पुरवठा करणे, स्वच्छ व आरोग्याबरोबरच रहदारीला योग्य ठरले जातील असे रस्ते ठेवणे, जागोजागी स्वच्छता गृहांची व सुलभ शौचालयांची व्यवस्था राखली जाते, निर्मिती करणे, घाण व नैसर्गिक पाण्याचा योग्य पध्दतीने निचरा होणारी गटारे व नाले निर्माण करणे वा बांधकाम करणे, शहरातील पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूने आणि चौका चौकात झाडे लावली जाणे अत्यंत गरजेचे आहे, यांची परिपूर्ण जाण व अनुभूती आयुक्त म्हणून तृप्ती मॅडम यांना निश्चितच असणार आहे. परंतु त्या सर्व बाबींची अंमलबजावणी मात्र नियमित करवून घ्यावी लागणार आहे. कर्तव्य म्हणून कर्मचारी व अधिकारी हा ग्रामीण भाग असल्याने नियमित व इमाने इतबारे करतातच असे नसते. त्यासाठी वरिष्ठांना जागृत राहावे लागते. आयुक्त म्हणून आपणासही ती काळजी कटाक्षाने घ्यावी लागणार आहे. तर आणि तरच आपला वचक राहिला जाईल अन्यथा गंडवणारे व कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची ही कमी नसते.
आपली काम करण्याची पध्दत अत्यंत उल्लेखनीय अशीच आहे. हा निजामकालीन परंतु फार जुना जिल्हा आहे. असं असलं तरी विद्यमान काळातील परिस्थितीवरुन जिल्ह्याची विकासाची गती की अधोगती हे सुध्दा आपल्या पूरते ध्यानी आले असेलही. या शहराचा विकास जो कोणी घडवून आणील त्यांना निश्चितच पूण्य लागेल यात तिळमात्र शंका नाही. आपल्या हातून ती सेवा घडू शकेल, प्रशासकीय कामांमध्ये कमालीची सुसुत्रता आणणे, कर्मचारी व अधिकारी यांना शिस्त लावली जाणे, वेळेचे बंधन व कामांमध्ये आवश्यक असणारे सुसुत्रीकरण यात आपणास कटाक्षाने लक्ष घालावेच लागणार आहे आणि आपण ते घालणार एवढा विश्वास दिसतोय.
महानगर पालिकेची व्यापकता, तेथे आवश्यक असणारी कामांची परिपक्वता, कर्तव्याची जाण व सामाजिक बांधिलकी मधील समता, बंधुता आणि विषमता या साऱ्या बाबींवर चांगला अभ्यास असल्याचे आपल्या कृतीतून निर्देशीत होत असते. कोणतंही काम कसं, कधी आणि कोणत्या पध्दतीने केलं जावं, याबद्दलची हातोटी, कृती चांगलीच अवगत आहे. जिद्द आणि चिकाटी व परभणीच्या विकासाप्रति असलेली आपली भावना प्रत्येक कृत्यातून दिसत असते. याचे एकमेव उदाहरणच द्यायचे झाले तर आपण निवडलेला विषय म्हणजेच महापालिका हा आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा स्थानीय स्वराज्य संस्थेशी निगडीत असतो. मग त्यात तळागाळातला मनुष्य असो वा मध्यमवर्गीय वा गर्भश्रीमंत. आर्थिक दुर्बल घटक असो वा अति श्रीमंत, अशिक्षित असो वा शिक्षित, पदवीधर असो वा पदव्युत्तर, या सगळ्यांची नाळ कोणत्या ना कोणत्या कामांच्या माध्यमातून महापालिकेशी जोडली गेलेली असते. किंबहुना त्या सगळ्यांच्या समस्यांचे व शहरी नागरी विकासाचे निराकारण कशा पध्दतीने केले जाते याचेही धडे आपण एमपीएससीच्या माध्यमातून पूरते गिरवले असल्याने तेही आपल्यासाठी कष्टप्राय असे दिसणार नाही. कर्तव्य कठोर असले तरी ते नियमांच्या चाकोरीत व कर्मठपणाच्या मूशीतून (चळवळीतून) पुढे आणले जाते गरजेचे असते, हे आपणास कोणा ज्योतिषांनी किंवा राजकारण्यांनी गरज नाही, हे आपल्या सामाजिक बांधिलकीतून स्पष्ट दिसत आहे.
आपण दोन वेळा घनकचरा प्रकल्पाला भेट देऊन त्याबद्दलची तळमळ निर्देशीत केली आहे. सहकारी अधिकारी वर्गाला योग्य त्या सूचना देऊन कामाचे गांभीर्य काय आहे, हे सुध्दा ध्यानात आणून दिले आहे. कर्तव्याचे व आदेशाचे पालन कोण किती करु शकतं, याचेही अवलोकन आपल्याला हळूहळू अवगत होणार आहे. एक महिला अधिकारी असूनही बाकी सगळे पुरुष सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून सेवा कशी करवून घेतात, यांचाही आपण भविष्यात आदर्श ठरले जाणार आहात हे विशेष असेच म्हणावे लागेल. बुध्दीचा अधिष्ठाता श्री गणरायांच्या आगमन समयी आपलेही या परभणी नगरीत झालेले आगमन विकासाभिमुख असेच ठरले जावो, हीच मनस्वी तळमळ, बाकी सर्व क्षम.