दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : भाजपकडून बारावतीवर लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बारामतीत येणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर स्थानिक भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पवार कुटुंबीयांना लक्ष्य करण्यात येत आहे.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज भाजप नेत्यांचा चांगलाच समाचार घेत त्यांना खणखणीत सवाल केला आहे.
अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घालत भाजपला सवाल केला की, ‘केंद्रानं 2 टक्के द्यायचं कबूल केलं होतं ते आता बंद केलं का? आता शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजानं कर्ज मिळू नये? का बंद केलं?’
पुढे अजित पवार म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं भाजपवाले, केंद्रातील नेते देत नाहीत. हे सगळं सोडलं आणि बारामतीत गेलेत. तिथं धडका मारून काही होणार आहे का?’
========================
बारामती जिंकण्याची भाषा भाजपकडून सुरू असताना त्यांनी भाजपला टोला लगावला. ‘मागेही असंच कुणालातरी बारामतीतून उभं केलं म्हटलं रहा बुवा. मी कुठलही निवडणूक असली तरी समोरचा माणूस ताकदवान आहे असं समजूनच उभं राहतो. ते ताकदवान आहे म्हणून उतरलो तर त्याच्यासकट सगळ्यांचं डिपॉझिटच गेलं’, असा टोला त्यांनी लगावला.
‘मला काहींनी विचारलं आता हे येणार ते येणार, म्हटलं येऊ द्या तुमच्या काय पोटात दु:खतंय. आम्ही त्यांचं स्वागत करू, त्यांचा अधिकार आहे’, असं ते म्हणाले.
====≠=====================