दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
हिंगोली जिल्ह्यांमध्ये मुलीचे विष पाजून हत्याकांड केल्याची घटना समोर आली असून सदरची घटना ही महाळशी ता. सेनगाव जि. हिंगोली येथे घडली आहे. रमाईच्या लेकीला विष पाजून मारुन टाकले, या घटनेची माहिती देत असताना मुलीच्या वडिलांना अश्रूंचा बांधा फुटला… यावेळी मुलीचे वडील पुढे म्हणाले माझी मुलगी दीक्षा वय १९ वर्षीय आणि २४ वर्षे आरोपी सचिन रामेश्वर बरर्डे याचे प्रेम होते गेले तीन वर्ष तो तिला लग्नांचे आमिष दाखवून तिच्या शरीराचा उपभोग घेत होता. तसेच वारंवार बलात्कार ही करीत होता दीक्षा निरागस्त, बौद्ध कुटुंबातील असून तिने त्याच्यावर विश्वांस ठेवला. जेव्हा या प्रकरणाची माहिती वडिलांना कळले असता वडिलांनी दीक्षा समजावून सांगितले की आपण गरीब आहोत हे स्वताला पाटील समजतात त्यांना जातीचा माज आहे आपल्या सोबत असा धोका नको असे तू यापुढे वागू नकोस… दीक्षा च्या आई वडील शेतामध्ये गेले असता दीक्षाही घरांमध्ये एकटीच होती व तिचा लहान भाऊही घरी होता. यावेळी गावातीलच आरोपीने तुला माझी आई बोलवते असे सांगत आरोपीने आपल्या घरी दीक्षाला बोलवून घेतले. सदर आरोपीने तिच्यासमोर थंड डोक्यांने घडविलेला प्लॅन अंमलात आणला गेला. दीक्षाही तीन महिन्यांची गर्भवती होती. यावेळी सदर आरोपीने तिचा गर्भपात केला. आपण काही दिवसांत लग्न करु असेही त्याने तिला गोड बोलून आरोपीने स्वतःच्या घरी बोलवून घेऊन तिला विष पाजून मारून टाकले. या घटनेची नोंद गोरेगांव ता.सेनगांव पोलीस स्टेशन येथील हे प्रकरण आहे. चार आरोपींवर ॲट्रॉसिटी ३०६ अंतर्गत कारवाई झाली. यात दोन आरोपींना अटक केले तर दोन आरोपी सध्या फरार दाखविले आहेत. मात्र पोलीस प्रशासनाकडूंन अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्यांचे पीडित मुलीच्या वडिलांनी सर्व राज्यस्तरीय पत्रकार श्री. पुरीगोसावी यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. यावेळी आम्हांला तुमच्याकडूंन न्याय मिळाला पाहिजे, संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे आम्हांला तुमच्याकडूंन सहकार्य मिळावे अशी अपेक्षा पीडित मुलीच्या वडिलांनी श्री.पुरीगोसावी यांच्याकडे केली आहे. स्वतःच्या मुलीच्या माहिती देत असताना पीडित मुलीच्या वडिलांना अश्रूंचा बांधा फुटला. सदर पीडित मुलीचा ३ वर्ष वापर केला. आणि ऐंन लग्नांच्या वेळेला ती महार असल्यांचे समोर आले पण या घटनेमुळे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यांमध्ये एकच खळबळ उडाली तसेच या घटनेबाबत ऑल इंडिया पत्थर सेना या घटनेचा निषेध व्यक्त करण्यांत आला.