दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी -दिपक काकरा.
नागरिक त्रस्त;नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष
जव्हार:- पर्यटनाचा ” दर्जा प्राप्त असलेल्या जव्हार शहराच्या सृष्टी सौंदर्यामध्ये विद्रूपीकरण करण्याचा घाट हा जव्हार नगरपरिषद प्रशासनाच्या माध्यमातून होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.प्रशासनाला तर नागरिकांच्या पायाभूत सुविधांचा विसर पडला आहे.शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या पाचबत्ती परिसरातून जाणार मुख्य रस्ता मुख्य आहे.या रस्त्याला मोठ्या प्रमाणात खोल खड्डा पडला असून वाहन चालकांना व पादचारी नागरिकांना या ठिकाणी ये-जा करताना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.विशेष म्हणजे ही बाब सहज डोळ्यांना दिसणारी असली तरी स्थानिक प्रशासनाला ही समस्या अजून लक्षात का येत नाही? असा संतप्त सवाल उमटत आहे.
गेल्या दहा ते बारा दिवसांपासून या रस्त्याला पडलेल्या खड्ड्यामुळे लहान बालके,महिला व वृद्ध नागरिक रस्त्यावर चालत असताना खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न येता पडून जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासन व्यवस्थेने नागरिकांच्या दृष्टीने पायाभूत सुविधा कडे लक्ष देत ही समस्या सोडविणे गरजेचे असताना अजून पर्यंत ही समस्या का सोडवली जात नाही? की अजूनही काही नागरिकांना पडून जखमी व्हायची वाट नगरपरिषद प्रशासन पाहत आहे की काय? अश्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
या खड्यामुळे अनेकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले आहे.तर अनेकांना या खड्यातील साचलेल्या पाण्याचा मारा विनाकारण सोसावा लागला आहे.रस्त्यावरील या खड्याने महिला वाहनचालकांची खूपच त्रेधातिरपिट उडत असते.जोरात गेलेल्या वाहनांमुळे शाळकरी मुलांच्या अंगावर पडलेल्या पाण्याने गणवेश बदलावे लागले आहेत.
जव्हार नगर परिषदेच्या पाणीपुरवठा होत असलेल्या जलवाहिनीवरील वॉल या भागात असल्याने, जलवाहिनी मध्ये काही बिघाड झाल्यास खोदकाम करावे लागते त्यामुळे खोदकाम करावे लागत आहे,खड्डा बुजविण्यासाठी विभागात सांगितले आहे.शिवाय रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम होणे प्रस्तावित असून पाऊस कमी झाल्यावर काम होणे अपेक्षित आहे.
प्रवीण जोंधळे,अभियंता, बांधकाम विभाग,जव्हार नगरपरिषद