दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
दसरा मेळाव्यानिमित्त शिवसेना या पक्षाचा इतिहासात पहिल्यांदाच काहीतरी वेगळं घडलं ते म्हणजे एकाच पक्षाचे दोन मिळावे आणि त्यासाठी पण गर्दी जमवण्याची रस्सीखेच, माध्यमांमध्ये गर्दी जमावानं या वरून व्हायरल झालेले वेगवेगळे व्हिडिओ काहीतरी वेगळाचं संदेश देऊन जातात.
प्रत्येक्ष्यात एक गोष्ट मात्र नक्की, शिवसेनाच्या दोनी मेळाव्यात गर्दी तुडुंब, मग आता सामान्य व्यक्तीला प्रश्न पडावा तेच समोर, एवढ्या मोठ्या प्रमाणावर ती गर्दी जमली कसी? पण यामागे नक्कीच गोष्ट दडलेली आहे आणि ती संभ्रमात टाकणारी पण आहे. उद्धव ठाकरे च्या सभेला गर्दी होणं साहजिक, कारण तो 56 वर्षापासून चालत आलेला दसरा मेळावा आहे.
पण एकनाथ शिंदे यांच्या सभेला जमलेली गर्दी ही बोलावलेली? का प्रेमापोटी एकनाथ शिंदे चे भाषण ऐकायला आलेली? असो या दोन्ही गोष्टीचे उत्तर न मिळणे हेच बरे कारण आत्तापर्यंत महाराष्ट्रालाच कळलं नाहीये नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात चाललय काय? म्हणून वरील दोन्ही प्रश्नाचे उत्तर मिळणारच नाहीत. दसरा मेळाव्याला प्रत्यक्ष सुरुवात झाली दोन्ही बाजूंच्या काही नेत्यांनी भावनिक व अप्रत्यक्षपणे टीका केल्या. कालचा शिवाजी पार्कवर चा दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांच्या अगोदर गाजवला ते सुषमा अंधारे यांनी, सुषमा अंधारे यांनी बोलताना, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामदास कदम, अशा अनेक बड्या मंडळीला टार्गेट केलं, आणि त्यांचं कोणते हिंदुत्व आहे. आणि ते कोणत्या हिंदुत्व बद्दल उद्धव ठाकरे यांना शिकवतात असा थेट सवाल करत त्यांनी त्यांच्या बोलण्याची झलक शिवाजी पार्कवर दाखवून दिली. आणि शिवसेना ही कशी उद्धव ठाकरेचे आहे आणि ती कसी मजबूत आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात गाजलं ते भाषण म्हणजे शहाजी बापू पाटील यांनी तर चेक अरेरावी करत उद्धव ठाकरे यांना आव्हानच केलं. कदाचित हे महाराष्ट्रातील जनतेला थोड खटकला असेल. आणि हो शिवसेनेचा निष्ठावंतांना तर खटकलंच पाहिजे कारण कालपर्यंत मातोश्री वरती मुजरा करणारा आत्ता अरेरावी करतोय? त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला पण काही कळत नाही नेमका कोण खरं आणि नेमका कोण खोटं.
दोन्ही गटातील नेत्यांनी आमची शिवसेना कशी खरी हेच सांगण्याचा प्रयत्न केला. आजचा दसरा मेळावा मध्ये विशेष तर काहीच नव्हतं टीकाटिप्पणी शिवाय! दोन्ही गटांनी एकमेकांवर भरभरून टीका केल्या.
उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली तेव्हा सगळ्यांची उत्सुकता होती ती नेमकं बोलणार काय? पण पहिले पाढे पंचावन्न जे नेहमी बोलतात ते दसरा मेळाव्यात बोलले, एकनाथ शिंदे वरती त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे टीका केल्या, आणि त्या सर्व टीकेचे उत्तर एकनाथ शिंदे यांनी चालू सभेमध्येचं दिले.
कालचा दसरा मेळावा हा दोन गटासाठी किंवा एक शिवसेना पक्ष मधल्या दोन गटासाठी होता. एकमेकांवर टीका झाल्या एकमेकाची लायकी काढण्या पर्यंत पोहोचले, एकमेकाच्या घरातील लोक फोडण्या पर्यंत पोहोचले पण महाराष्ट्रात महागाई आ वासून बसलेली आहे. त्यावर ते दोघे पण बोलले नाही बर का? कदाचित विसरले असतील लोकांना कसं वेड्यात काढायचं आणि आपली बाजू हाणून न्यायचीं हे कळलं मला तरी वयक्तिक कालच्या मिळाव्यात
जर तुम्हाला वैयक्तिकचं एकमेका वरती टीपा टिप्पणी करायची होती , त्यासाठी मेळाव्याची गरज तरी काय?
त्यावेळेस हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दसरा मेळाव्यात निमित्त बोलायचे त्यावेळेस शिवाजी पार्क मध्ये लोक आवडीने त्यांचे विचार ऐकायला यायचे, मेळाव्याच्या दिवशी विचारांची देवाण-घेवाण व्हायची, महाराष्ट्रातील घडामोडी वरती भाष्य व्हायचं, लोकांच्या हिताचे विचार, शेतकऱ्याचा हिताचे विचार, महाराष्ट्राच्या उन्नतीचे विचार, हिंदू धर्माविषयी जनजागृती अशा अनेक सामाजिक लोकहीताच्या विचाराचे देवाण-घेवाण दसरा मेळाव्याच्या दिवशी होत असें. पण आता ते सगळं लुप्त झालेलं दिसलं. आणि कालच्या दसरा मेळाव्यात फक्त आणि फक्त एकमेका वरती वैयक्तिक टीका झाल्याचा महाराष्ट्राने टीव्ही वांहिणी वरती ऐकलं बस त्याच्या पलीकडे काहीच नाही. शेतकऱ्यांच्या हिताचं, महागाई, महाराष्ट्राच्या उन्नतीचा, लोक हिताचं, सार्वजनिक, ज्यात महाराष्ट्राच भलं होईल असं कमीच ऐकायला मिळालं? सगळं बोलून झाल्यावर ती माननीय मुख्यमंत्री एकनाथ रावजी शिंदे यांनी काही गोष्टीच्या घोषणा केली. पण ते सगळं सांगत असतानाही एक गोष्ट वारंवार बोलत होते . भरपूर काही आहे पण आत्ताच सांगत नाही. माहित नाही ते दुसरी सभा लवकरात लवकर घेणार असावेत त्यामुळे त्यांनी काही गोष्टी सांगायच्या मागे ठेवल्या असाव्यात.
पण असो… दसरा मेळावा कसा वाटला, दोन्ही नेत्याचे विचार कसे वाटले, दोन दिवसात आणखी प्रखड पणे सोशल मीडिया वरती जनतेकडून आलेल्या प्रतिक्रिया वर ती पाहायला मिळेलच.
डि. एस. लोखंडे पाटील
मुख्य संपादक – दै चालु वार्ता