दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
सत्य पेरण हे सर्व उत्कृष्ट कार्य आहे.पण सध्या रातोरात प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी व कामी वेळात नावलौकिक होईल प्रसिद्ध मिळेल हया भोळ्या अशेतुन जास्तीत जास्त अर्ध सत्य पेरल जात आहे .आणि याचे दुष्परिणाम आज आपल्याला काही प्रमाणात दिसत असुन येणार्या कालखंडात याचे विदारक आणि गंभीर परिणाम नक्कीच उग्र रूप धारण केल्या शिवाय राहणार नाहीत.महणुन अर्ध सत्य हे नेहमी घातक अहितकारक असल्याने अर्ध सत्य पेरण हे कमी झालं पाहिजे. पुर्ण सत्य हे लाभकारी असतं. पण ते पचण्यासाठी जड कठिण जात आणि अर्धसत्य तात्काळ प्रसिद्धी देत प्रभाव दाखवत.हे जरी वास्तव असल तरी सुद्धा अर्धसत्य हे आपल्या स्वतःसाठी व भविष्यातील पिढी साठी योग्य चांगले परिणाम निर्माण करणार नसतं. म्हणून पेरणी करणा-यांनी स्वतः च्या प्रसिद्धी साठी अर्धसत्य पेरणी करून नये. संपुर्ण सखोल महित असेल तर त्यावर भाष्य कराव नाही .तर मौन सर्वतम असतं .पण शक्यतो असं होतं नाही अर्ध ज्ञानावरून मत भूमिका व्यक्त करून संवग प्रसिद्ध हाच एकमेव अजेंडा असेल तर समाजाला योग्य दिशा मिळणार नाही .कारण योग्य दिशा हि पुर्ण सत्या मध्ये असते . आणि पुर्ण सत्य हे मांडण्यासाठी निस्वार्थ भावना अपेक्षित असते . महर्षी तुलसीदास यांनी रामायण हे महाकाव्य लिहल महाबली हनुमान यांच्या विषयी महती विशाद करणारी हनुमान चालीसा लिहली एवढं महान लेखन किंवा विचार आज कोणीही निर्माण करू शकत नाही.हे वास्तव आहे.तरी सुद्धा रामायणातील सुरवातीच्या किमान सतर ओव्या ह्या मी किती अल्प ज्ञानी आहे.हेच दाखविण्यासाठी महर्षी तुलसीदास यांनी लिहल्या आहेत हे विशेष आणी त्या मध्ये असं म्हटलंय मी अल्प ज्ञानी असुन आपल्या समोर तोकडं ज्ञान ठेवण्याचं धाडस करतोय कृपया मला समजुन घ्या अशी विनंती करतात.हि मोठी महानता उदारता आहे हि महर्षी तुलसीदास यांची आणि आपण आपल्याला दोन तीन ओळी समजल्या कि आपण स्वतः महाज्ञानी समजतो ज्ञान सम्राट समाजभूषण , रातोरात अजुन कोणतं कोणतं भुषण म्हणजे भुषण आणि सम्राट यांचं सध्या खूप मोठ साम्राज्य निर्माण होत आहे.पण वास्तविक पाहिलं तर सगळे अर्धसत्य सम्राट म्हटलं तरी चालेल अशी काहीशी परिस्थिती सध्या तरी चालेलेली आहे. त्या मध्ये अणाखी भर म्हणजे आपल्या पेक्षा दुसर कोणीच हुशार नाही . आपल्याला इतका ज्ञान महिती अभ्यास इतर कोणाकडही नाही असं समजत आपण वावरतो . आणि नेमकं याच दरम्यान कळत न कळत आपल्या कडुन अनेक संदर्भात अर्ध सत्य प्रसारीत होत . आणि त्याचे दुष्परिणाम हे अनेकांवर होतात . समाज हि प्रयोगशाळा नसते. कि आपण आपले अनेक मत त्यांच्यावर थोपवले पाहिजेत समाजावर मत थोपवणारे आपण कोण असतो .आपलं अस्तित्व काय आपलं ज्ञान किती आपला अनुभव किती, समज किती, भविष्यातील वास्तव आणि विद्यमान स्थिती यातील तफावत आणि काळाची नजर ओळखून अगोदर स्वतः मध्ये परिवर्तन केले पाहिजे स्वतः मध्ये परिवर्तन झालं कि लोक नक्कीच योग्य वाटल तर ते स्वीकारतील.आणि नाही वाटलं तर नाकारतील म्हणून कोणत्याही विषयावर विचारांची पेरणी करताना अर्धसत्य पेरणी होऊ नये .याची दक्षता खबरदारी हि घेतली गेलीच पाहिजे. आणि समाजातील प्रत्येक घटकांनी जागरूक होण्याची आवश्यकता आहे.जेणेकरून अर्धसत्य बाबी ,महिती प्रसारीत होऊन आपलंच नुकसान होणार नाही याची काळजी सगळ्यांनी मिळून घेण्याची आवश्यकता आहे. खोटं अर्धसत्य हे खुप काळ प्रभावी राहत नाही.त्याची चमक काही क्षणात कमी कमी होत जाते . आणि शेवटी अर्ध सत्य निष्प्रभ होते . परंतु अर्धसत्याच्या नादी लागून आपला रस्ता मार्ग चुकला तर मग आपल्याला पुन्हा रस्त्यावर योग्य मार्गावर येण कठिण जात . म्हणून आपण स्वतः दक्ष सावध राहिले पाहिजे.आणि अर्ध सत्य प्रसरण थांबवलं पाहिजे.आणि अर्धसत्य निर्मिती केंद्राकडे पण आपण दुर्लक्ष केले . सनसनाटी कडे आपण दुर्लक्ष केले तर नक्कीच बदल जाणवेल.आणि सनसनाटी युग आपोआप कमी होईल व सत्य स्वीकारणं क्रमप्राप्त ठरेल . म्हणून सगळ काही हे आपल्या सगळ्यांच्या भुमिकेवर अंवलबुन आहे.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक 9011634301