दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी -कवि सरकार इंगळी
हातकणंगले तालुक्यात अनेक गावात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाल्याने शेतकरीऱ्यांची तांराबळ उडाली.इंगळी परिसरातल अनेक गावात मुसळधार पाऊस झाल्याने. अनेक शेतीमध्ये पाण्याने सरी भरून पाणी राहिलेने नुकताच ऊसाची लागण केलेली रोपे या पावसाच्या पाण्यामुळे रोप उगवण होणार नाही या मुळे शेतकरी चिंतेत आहे.शिवाय अनेक शेतकरी सोयाबिन पिक कापून टाकलेने ते खराब झाले आहे.काही शेतकरी शेंगाचे पिक घेतले आहे.शेंगा काढणीला आलेल्या आहेत.आता पाणी शेतात भरून राहिलेने ते कसे काढायचे या काळजीत शेतकरी आहे.
एकंदरीत अचानक विजेच्या कडकडाटासह पडलेला पाऊसहा कापणीला आलेल.या पिंकांना, नवीन ऊस रोप,तसेच चार दिवसात सहकारी साखर कारखाने सुरू होणार असलेने ऊस तोड करणेचे अवघड झाले आहे.पानंद रस्ते या पावसात चिखलमय झाले आहेत.