दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : बिग बॉस 16’मध्ये दिग्दर्शक साजिद खानची एन्ट्री झाल्यापासून खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर पहिल्याच दिवसापासून यूजर्सनी चॅनल आणि ‘बिग बॉस 16’ मेकर्सला फटकारले.
मी टू’ चळवळीदरम्यान अनेक अभिनेत्रींनी साजिद खानवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी या प्रकरणी ‘बिग बॉस 16’च्या निर्मात्यांवर नाराजी व्यक्त केली. तसेच साजिद खानला शोमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. स्वाती मालीवाल यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनादेखील पत्र लिहिले आहे.
शोमधून काढून टाकण्याची मागणी
‘मी टू’ चळवळीनंतर साजिद खान पहिल्यांदाच ‘बिग बॉस 16’ मध्ये सार्वजनिकरित्या दिसला. यावेळी त्याने सांगितले होते की, त्याच्याकडे 4 वर्षांपासून कोणतेही काम नाही. यानंतरही साजिद खानबाबत सोशल मीडियावर सातत्याने प्रतिक्रिया येत होत्या. स्वाती मालीवाल यांनी ट्विटरवर एक पत्र शेअर करत साजिद खानला शोमधून काढून टाकण्याची मागणी अनुराग ठाकूर यांच्याकडे केली आहे.