दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
मंगनाळी :- कंधार तालुक्यातील मौजे मंगनाळी येथील थोर समाजसेवक,कवि, लेखक,गायक, गीतकार, नाटककार,नाट्यदिग्दर्शक, आदर्श शिक्षक, कळका येथे जास्त काळ नौकरी करून कळका गावातील शेकडो विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे देवदुत नागोराव येसाजी टोम्पे गुरूजी यांचे आज दु:खद निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी आज दि.१७ आक्टोबर २०२२ रोज सोमवारी दुपारी तीन वाजता त्यांचे मुळगाव मंगनाळी येथे होणार आहे.दैनिक चालू वार्ताचे पत्रकार बाजीराव गायकवाड यांचे ते गुरू होते.त्यांच्या जाण्याने मंगनाळी व कळका परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.ते बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तसेच समाजातील लोकांची दाडी कटींग करून बौद्ध समाजाची सेवा करीत होते.असा थोर समाजसेवक आता होणे शक्य नाही.त्यांच्या पश्चात विस्तार अधिकारी अंगद टोम्पे (मुलगा), डॉ.राजू टोम्पे वैद्यकीय अधिकारी (मुलगा), दोन सुना,नातू असा परीवार आहे.दैनिक चालू वार्ता परीवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.