दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
युवा सामर्थ्य प्रतिष्ठान आणि बोहाडा मंडळांचा सन्मान
जव्हार:-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत पालघर जिल्ह्यांअंतर्गत ‘एकच ध्यास माझ्या गावचा विकास’ हे ब्रीद वाक्य घेऊन जव्हारच्या दिव्य विद्यालय(शिरपामाळ) येथे अजित मराठे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.या मेळाव्यात १०१ ग्राम आरोग्य रक्षकांच्या उपस्थितीत प्रमुख वक्ते म्हणून चैतराम पवार यांनी बोलताना वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून सुरू असलेल्या लोकोपयोगी जल,जंगल,पशुधन याचे महत्त्व विषद करून वन जमिनी आणि वन कायद्याचे महत्व सांगून वन जमिनी ह्या ग्रामसभेच्या अधिकाराखाली कशा आणता येतील याची सखोल माहिती दिली.मेळाव्यात उपस्थित असलेले ग्राम आरोग्य रक्षक यांनी ग्रामीण भागात काम करतांना आरोग्याचे प्राथमिक उपचार करून मोफत सुरक्षा देऊन सेवा करण्याचे कार्य सुरू असल्याने गरीब जनतेला मोठा आधार आणि फायदा या ग्राम आरोग्य रक्षकांमार्फत होत आहे.
या मेळाव्यात चैतराम पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार उपस्थित असलेल्या ग्राम आरोग्य रक्षक आणि कार्यकर्ते यांच्या कडून प्रश्नावलीच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या प्रश्नांना संगनमताने उत्तरांच्या माध्यमातून विश्लेषण करून देण्यात आले.ग्रामीण भागात उपलब्ध असलेल्या वनसंपत्तीची रक्षण करून उपलब्ध असलेल्या वनऔषधी झाडांची माहिती देऊन त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे ओळखुन संरक्षण करणे गरजेचे आहे.
या मेळाव्याचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या डॉ.जयश्री भुसारा-भोये यांनी ग्रामीण भागातील आरोग्य विषयक माहिती देऊन आपल्याला होणारा त्रास जास्त वेळ न घालवता वेळेत उपचार करून घेण्याची आवाहन त्यांनी केले.या वेळी जनकल्याण समिती कडून ग्रामीण भागातील आदिवासी परंपरा कायम चालू ठेवणाऱ्या घिवंडा येथील बोहाडा मंडळ आणि प्रामुख्याने आदिवासी ग्रामीण भागात काम करणाऱ्या युवा सामर्थ्य प्रतिष्ठान यांचा या मेळाव्यात सन्मान करण्यात आला.या प्रसंगी अनिल मनोरे,हर्षल भानुशाली,आपले मानवाधिकार फाउंडेशन,युवा सामर्थ्य प्रतिष्ठान,बोहाडा मंडळ,जनकल्याण समितीचे कार्यकर्ते तसेच असंख्य ग्राम आरोग्य रक्षक उपस्थित होते.