दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:वीर सैनिक ग्रुप नेहमीच सामाजिक उपक्रमात सहभाग घेत असतो तसेच विविध कार्यक्रम देखील घेत असतो
मागील वर्षी प्रमाणे या ही वर्षी वीर सैनिक ग्रुप च्या वतीने सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या सैनिक मेळाव्यात महाराष्ट्रात प्रथमच सैनिक तसेच माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला व या वर्षी पासून सैन्यात असून विविध समाज कार्य करणाऱ्या सैनिकांचा देखील वीर सैनिक गौरव सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच जे कुणी माजी सैनिक सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मेहनत घेतात अशा काही माजी सैनिकांना देखील पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
तसेच जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीर माता-पिता /पत्नी परिवाराला बोलावून त्यांना देखील सन्मानित करण्यात आले ,
या वेळी कार्यक्रमाचे उद्घाटन स्वा. रा. ती. मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. उद्धव भोसले यांनी केले व कार्यक्रमाचे अध्यक्ष NCC 52 महाराष्ट्र बटालियन चे कर्नल जी .रंगराव हे होते , कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. अभिजीत राऊत व (माजी नगराध्यक्ष माजी सैनिक) मा लक्ष्मण देवदे.
तसेच वरिष्ठ मान्यवर म्हणून (भा. मा. सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष) सार्जंट रामराव थडके , (सैनिक फेडरेशन जिल्हाध्यक्ष) बालाजी चुकलवाड , राजे छत्रपती अकॅडमी चे संचालक ज्ञानेश्वर डुमने , पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे विभागीय तसेच जिल्हाध्यक्ष हायुन पठाण (मंडळ अधिकारी), (जिल्हा उपाध्यक्ष सशस्त्र सेना सुरक्षा दल) जनार्दन शेजुळ, हिंगोली जिल्हा अध्यक्ष सय्यद मीर साहेब ,विशेष व्याख्यान अध्यक्ष मायबोली मराठी परिषद झी टीव्ही अनन्य पुरस्कार प्राप्त मा. शिवाजी अंबुलगेकर यांनी केले .
तसेच वीर सैनिक ग्रुप चॅरिटेबल ट्रस्ट ची कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली
जिल्हाध्यक्ष पदी – गजानन गव्हाणे , जिल्हा उपाध्यक्ष पदी – गोविंद निलपत्रेवार , जिल्हा सचिव पदी – री कॅप्टन विठ्ठल कदम , जिल्हा सहसचिव पदी – चंद्रकांत तेलंगे , जिल्हा कोषाध्यक्ष पदी – सुभेदार विकास बल्फेवाड , जिल्हा कार्याध्यक्ष पदी- जयेश भरणे, जिल्हा सोशल मिडिया प्रमुख पदी – अर्जुन नागेश्वर तसेच देगलूर तालुका अध्यक्ष पदी सुभेदार संतोष केंचे मुदखेड तालुका अध्यक्ष पदी सुनील चौदन्ते यांची निवड करण्यात आली ,
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष गजानन गव्हाणे , सचिव कॅप्टन विठ्ठल कदम , उपाध्यक्ष गोविंद निलपत्रेवार , जयेश भरणे , अर्जुन नागेश्वर , बलबीर सिंह , सागर ढालकरी, सत्यव्रत सुरावार, सायली गोरे , प्रांजली गुडमलवार, साई पाटील ,प्रसाद तेलंग , विनय मंतुरी , स्वप्नील मेरगु , पूनम पवार , ऋत्विक , रोहित ढगे , राज ढगे ,नरसिंग मुरकुटे ,प्रदीप टाक व समस्त वीर सैनिक ग्रुप च्या सदस्यांनी मेहनत घेतली ,
जिल्हाधक्ष गजानन गव्हाने यांनी संपूर्ण वीर सैनिक परिवारा तर्फे उपस्थित मान्यवरांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली
जय हिंद
सैनिकांमुळे देश सुरक्षित – प्रो . डॉ. उद्धव भोसले (कुलगुरू)
कार्यक्रमाचे उद्घाटक कुलगुरूंनी म्हणले की आज देश सुरक्षित आहे तर फक्त सैनिकांमुळेच आणि असा हा सैनिक मेळावा मी कधीही पहिला नाही व जिथे शिक्षण व गुणवंत यांची नावे येतात तिथे मला आवर्जून जावेसे वाटते . या सैनिक मेळाव्याच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थी सत्कार करण्यात येतोय खूप चांगली गोष्ट आहे व या मुळे इतर मुलांना जिद्दीने अभ्यास करण्याची एक दिशा मिळते , अशा सैनिक मेळाव्यात मी पहिल्यांदाच आलोय आणि सैनिकांसोबत घालवलेला वेळ अविस्मरणीय राहील असे ही ते म्हणाले ,
आजी व माजी सैनिकांच्या समस्या सोडवू – जिल्हाधिकारी अभिजित राऊत
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी मा. अभिजित राऊत यांनी सैनिक मेळाव्याला संबोधित करतांना असे सांगितले की सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नक्की प्रयत्न करेल व शहीद जवानांच्या परिवाराला शेती व जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयन्त करू व सैनिक स्मरकांसाठी नांदेड मधे जागा उपलब्ध करून देऊ अशी शास्वती दिली