दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे…
मंठा निसर्गाचा लहरीपणामुळे कापसाचे अतोनात नुकसान झाले उरले सुरले मजूरा अभावी तालुक्यातील मजूर उसतोडनीला गेल्या कारणाने व रब्बीची पेरणीचे काम चालू असल्यामुळे मजुराची कमतरता भासत आहे.यामुळे शेतकरीवर्ग बेजार असून मजुराची मनधरणी करावी लागत आहे कापूस वेचणीला दहा रुपये किलो प्रमाणे मजुरी देण्यात येत आहे.त्यांना येण्या जाण्यासाठी वाहणाची व्यवस्था करावी लागत. त्यामुळे शेतकऱ्यांना खर्च जास्तीचा लागत आहे.शेतकऱ्यांना सकाळी लवकर उठून मजुराला शेतात घेऊन जाणे रात्री आठ पर्यंत मेहनत करावी लागत आहे.काही ठिकाणी पुरुष मंडळीस कापूसवेचणीसाठी ओट्या बांधण्याची वेळ आली आहे.