दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -आशा रणखांबे
डॉ. विठ्ठल शिंदे यांनी लिहिलेल्या दलित पँथर क्रांतिकारी नोंदी पुस्तकाचे प्रकाशन (सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार ) ना. डॉ. रामदास आठवले यांच्या हस्ते आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण येथे नुकतेच करण्यात आले . याप्रसंगी ते बोलताना म्हणाले ,
” पँथर वाले आहोत आंबेडकरवादी /
लागू नका कुणी त्यांच्या नदी //
जय भीम म्हणते गाव गावातील दादी /
करू नका तुम्ही रिपब्लिकन चळवळीची बरबादी // माझ्यापाठिशी जे ताकतीने उभे राहिले खंदे /
त्यांचे नाव आहे विठ्ठल शिंदे //
जे कधीच कुणाचे झाले नाहीत मिंधे /
ते विठ्ठल शिंदे आहेत जयभीमचे सच्चे बंदे // असे ते व्यक्त झाले .
या आयोजित कार्यक्रमात डॉ. प्रदीप आगलावे , डॉ. वंदन महाजन , डॉ . मिलिंद कसबे, सुरेश सावंत ,प्रकाशन मंचावर ठाणे जिल्हा अध्यक्ष , सरचिटणीसांपैकी प्रा. एकनाथ जाधव , प्रा.रमेश जाधव, आण्णासाहेब रोकडे इ. मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी डॉ . विठ्ठल शिंदे यांनी दलित पँथर क्रांतिकारी नोंदी बाबत प्रास्ताविक करतांना म्हटले की,
” प्रारंभा पासून पँथरची सलग सतरा वर्षे झाली असून हा प्रवास दोन किंवा पाच वर्षांचा नाही . पँथर मध्ये महिला प्रारंभी पासून कार्यरत होत्या .साहित्यिकांनी पँथरची निर्मिती केली याबाबत डॉ. विठ्ठल शिंदे यांनी अर्धसत्य मान्य केले.
डॉ . प्रदीप आगलावे यावेळी बोलताना म्हणाले की, ” दलित पँथर क्रांतिकारी नोंदी हे समाजाचं दस्तऐवजी करण आहे . दलित पँथर नाव ऐकल्यानंतर प्रस्थापित व्यवस्था होती त्यांच्यात चर्चा होत असे पँथर शस्त्र नव्हते. ऐवजी पेन लेखणी होती. वंचितांवर अन्याय कर्त्यांच्या विरोधातील विद्रोह. पँथर ऐतिहासिक चळवळ . सुंदर ग्रंथ विठ्ठल शिंदे दलित चळवळीतील इतिहास आणि दस्तऐवज . पँथर शहिद इतके जीवाची पर्वा केली नाही ही गाथा ही माहिती देणारा ग्रंथ पँथरचा दस्तऐवज आहे”.
डॉ . वंदना महाजन या वेळी बोलताना म्हणाल्या, “इतिहास ज्वलंत ठाणे जिल्ह्यातील नोंदी उगमावर अनेकांनी कुवतीनुसार केले आहे. आता नवा शोध घ्यावा लागेल दलित पँथर ची ऐतिहासिक मांडणी करता येईल . विठ्ठल शिंदे यांनी मांडणी केली स्त्रियांची चळवळी, दलित पँथरच्या इतिहास मांडला जावा; अधिवेशने , ठराव, पँथर शहिद….. वैशिष्ट्ये हे सर्व समान्यपर्यत जाणे व प्रश्नांना भिडणे घटनात्मक अधिकाराचा विस्तार पाहिला आहे. कार्यकर्त्यांचे काम विविध पातळीवर सिद्धांतन करावे लागते .फुलेंना कुठेही दूर करता येत नाही . बुद्ध धम्मात पँथरचं सिद्धांतन मार्क्सवादआंबेडकरवादाच्या मुद्द्यावरची चर्चा बुद्धिझमच्या सिद्धांतानवर यांनी काम केले आहे. आंबेडकर वादच होता. पँथर लोप का पावली. पुनर्विचार सुरू होणे आवश्यक आहे. चळवळीचा खरा उल्लेख स्त्रियांच्या सहभागा विषयी कुठेही नोंदी नाहीत. त्याची चर्चा शिंदे सरांनी केली आहे. शिंदे सरांनी उपस्थित केलेले प्रश्न सुटू शकतात. इतिहास लिहितांना सूत्रबद्धता लागते. लोकांचा ऐतिहास लिहिला गेला नाही . कार्यकर्त्यांचा ऐतिहासिक महत्त्वाचा दस्तऐवज….. सर्व संदर्भ उपयुक्त ठरू शकतात” .
यावेळी शहिदांच्या स्मृतिशेषांच्या कुटूंबियांचा भागवत जाधव,आनंद मुत्रू , बाबा मोरे, रामकिशन करौतिया , देवराम लि हितकर, स्मृती. प्रकाश, स्मृती. मनोहर, स्मृती. राम सिंग सन्मान करण्यात आला . तर महिला पँथरमध्ये पद्मावती रणदिवे, जाईबाई गरुड, कलाबाई गांगुर्डे, हिराबाई रोकडे, मनीषा करलाद, शशिकला जाधव , लिलाबाई शिंदे, अभया सोनवणे, नयना खराटे यांचा सन्मान करण्यात आला . यावेळी पँथर किशोर घाटे , फकीर जगताप , शंकर काकळीस, करुणा सागर पगारे, रंजन जगतात , राशी उबाळे, अरुण पाठारे , मदन जाधव, सुनील रोकडे, दिनकर पवार, जय प्रकाश डोळस , गौतम सोनावणे, बाळासाहेब गरुड, राजा गांगुर्डे, प्रेम गोहिल, बबन मोरे, डी. एम. चव्हाण, सुधाकर चव्हाण, नाशिक, प्रकाश पगारे, बाळ भोईर, आण्णासाहेब रोकडे, रमेश जाधव, एकनाथ जाधव, विठ्ठल शिंदे, महादेव सोनावणे, अरुण कांबळे,मारुती जाधव, आनंद बुकाणे, भीमराव सावतकर इगतपुरी इ. मुंबई , नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि पश्चिम महाराष्ट्र मधील पँथर कार्यकर्त्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर शिंदे आणि डॉ . अलका पवार यांनी केले.