दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी हिंगोली- संभाजी गोसावी.
सेनगांव तालुक्यांतील कारेगांव शिवरांत स्वतःच भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून तरुणांने गळफास घेतला हा प्रकार रविवारी ( २७ नोव्हेंबर ) रोजी उघडकीस आला. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरुन वडिलांच्या नावे असलेले ७० हजाराचे कर्ज कसे फिटल या चिंतेत असल्यांने शेतकरी तरुणांने हे टोकाचे पाऊलं उचलले नवल जयराम नायकवाल (वय २८) असे मृत तरुणांचे नाव आहे. याप्रकरणी सेनगांव पोलीस ठाण्यांत आकस्मिंत मृत्यूची नोंद झाली. सेनगांव तालुक्यांतील कारेगांव शिवारांत पाच एकर शेती आहे या शेतात सोयाबीन व इतर पिके घेण्यांत आली होती. मात्र अतिवृष्टीमुळे तसेच सततच्या पावसामुळे पिकाचे चांगलेच नुकसान झाले त्यामुळे पेरणीसाठी घेतलेले ७० हजार रुपयांचे कर्ज फेडण्यांचा प्रश्नं नवल पुढे चांगलाच निर्माण झाला होता. दरम्यान नवल नायकवाल याने गावात हमाली कामे करून वडिलांचे कर्ज फेडण्यांचे प्रयत्न सुरु केले होते. मात्र कर्ज फिटण्यांस मोठा कालावधी लागेल त्यामुळे नवल हा अस्वस्थच होता. शनिवारी सायंकाळी तो हमालीचे काम करण्यासाठी जातो असे सांगून घराबाहेर पडला. यावेळी त्यांने स्वतःच्या मोबाईलवर स्टेटस ठेवून नमूद केले. मात्र या प्रकरणांचा उलगडा कुटुंबीयांना झाला नाही दरम्यान आज सकाळी नवल यांचा मृतदेह साई मंदिराच्या मागे असलेल्या आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला या घटनेची माहिती मिळताच सेनगांव पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे जमादार अनिल भारती, सुभाष चव्हाण यांच्या पथकांने तातडीने धाव घेवुन पाहणी केली. या प्रकरणी जयराम नायकवाल यांच्या माहितीवरुन सेनगांव पोलीस ठाण्यांत आकस्मिंत मृत्यूची नोंद करण्यांत आली.