दै चालु वार्ता वृत्तसेवा /
मुंबई : गार्डियन या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रवी शास्त्री यांनी हिंदुस्थानी टीकाकारांचे चित्रण केले आहे. ते म्हणतात, हिंदुस्थानात क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होणे हे ब्राझील आणि इंग्लंडमध्ये फुटबॉल संघाचे प्रशिक्षक होण्यासारखे आहे. तुम्ही नेहमी गन पॉइंटवर असता. तुमच्याकडे सहा महिन्यांतील उत्तम कामगिरी असू शकते, पण तुम्ही ३० धावांवर बाद होता. तेव्हा चाहते तुम्हाला गोळीच मारतील अशी स्थिती असते. अशात तुम्हाला पटकन विजय मिळवायचाच असतो.
आता आगामी टी-२० वर्ल्डकपनंतर विराट कोहली टी-२० चे कर्णधारपद सोडेल. पाठोपाठ रवी शास्त्रही प्रशिक्षकपदावरून पायउतार होतील. कार्यकाळ संपेल, पण शास्त्री मुदत वाढवून मागणार नाहीत.राजीनामा देतील. प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात त्यांच्यावर टीका झाली. त्याबद्दल सांगताना ते म्हणतात, तुम्ही नेहमी गन पॉइंटवर असता. चाहते तुम्हाला गोळय़ाच घालतील. माझी कातडी जाड आहे, त्यामुळे मला फरक पडत नाही.
गेल्या पाच वर्षांत टीम इंडिया कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. दोन वेळा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजय, इंग्लंडचा त्यांच्या घरच्या मैदानावर केलेला पराभव या गोष्टी मिळवल्या. टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून ज्या गोष्टी मिळवण्याचे स्वप्न पाहिले होते ते सर्व मिळवले आहे, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे.