दैनिक चालू वार्ता कंधार तालुका प्रतिनीधी-माधव गोटमवाड
मराठवाड्याच्या मातीतील अनमोल रत्न देशाच्या रक्षणासाठी कामी आलं देशासाठी बलिदान देऊन इतिहासाने शौर्य ची नोंद घ्यावी अशी असं महान राष्ट्र रक्षणाच कार्य करताना राष्ट्र हे सर्वपरी या भावनेने राष्ट्रासाठी जीवन समर्पित करणारे खुप कमी लोक असतात आणि अशा महान व्यक्तिमत्त्व पैकी एक महाराष्ट्र राज्य तील श्रीराम डुबूकवाड यांचे सुपुत्र बालाजी डुबुकवाड यांचं नाव अग्रक्रमाने घ्याव लागेल .जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले.या देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे यासाठी अनेक महान वीरांनी आपलं जीवन समर्पित केले आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा देशाच रक्षण करण्यासाठी अनेकनां शहिद व्हावं लागलं . जन्मताच काही माणसं सोन्याचा चमचा तोंडांत घेऊन जन्माला येतात तर काही माणसं आपल्या कार्याने आपली ओळख आपलं विश्व निर्माण करतात आणि असंच स्व कर्तुत्वांने मोठे झालेले एक महान नेतृत्व बालाजी डुबुकवाड हे होते . “समझोता उनसे किया जाता है,जो कुछ समझ सकते है। लेकिन जो कुछ समझते नही, उनके समझाया नही जाता, बल्की सबक शिकाया जाता है।। “
मराठवाडा मुक्ती संग्रामातील तेजोमय भुमि असणार्या नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील बाचोटी येथील शहीद जवान बालाजी डुबूकवाड यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1987 रोजी आई नागाबाई व वडील श्रीराम डुबूकवाड यांच्या पोटी बाचोटी येथे झाला .प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाचोटी येथे झाले तर माध्यमिक शिक्षण महेश विद्यालय शिरूर येथे झाले परत कंधार येथील शिवाजी हायस्कूल कंधार येथे 11 वी 12 पर्यंत शिक्षण झाले.
संघर्षमय परिस्थितीत आयुष्य आणि परस्थिती या दोन्ही सोबत एकत्र संघर्ष करत शालेय शिक्षण पुर्ण केले .तसं घरची परिस्थिती हि जेमतेमच होती वडील बाचोटी गावचे सरपंच ,कंधार पंचायत समिती सदस्य होते ,तसेच अ.म.भो.स.सेवा संघ कंधार ता अध्यक्ष, अ.म.भो.स.से. सं.पुणे नांदेड जिल्हा अध्यक्ष तसेच भाजपा ओबीसी मोर्चा दक्षिण जिल्हा अध्यक्ष अश्या विविध पदांवर काम केलेले . घरची परिस्थिती राजकारणाशी संबंधित असली तर राजकारणात प्रवेश न घेता देश सेवा हा मंत्र बीज घेऊन बालाजी डुबुकवाड यांनी आपण देशाच्या कामी आलो पाहिजेत या समर्पित भावनेने जेमतेम 12 वी झाल्यानंतर आर्मी कॅम्प मधे राहून आर्मी ची तयारी केली व तो दिवस उजाडला अतिशय खडतर मेहनत घेऊन वयाच्या 20 व्यं वर्षी 8 ऑगस्ट 2007 रोजी आर्मी भरती मध्ये सिलेक्शन झाले व बेळगाव येथे ट्रेनिंग साठी तो रवाना झाला. लहानपणीच त्यांनी ठरवले होते की आपण भारत मातेसाठी काही तरी करायचे, त्यामुळेच त्यांनी देशसेवेसाठी प्रतिज्ञा घेतली व देशसेवेसाठी रवाना झाला.
जब आँख खुले तो धरती हिन्दुस्तान की हो !
जब आँख बंद हो तो यादेँ हिन्दुस्तान की हो!!
हम मर भी जाए तो कोई गम नही लेकिन!
मरते वक्त मिट्टी हिन्दुस्तान की हो!!
भारतीय सैनिकाला बराच मोठा काळ कठोर प्रशिक्षण घ्यावे लागते. तो केवळ पगाराला महत्त्व देत नाही. भारतातील प्रत्येक सैनिक आपल्या जन्मस्थानाला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आणि प्राणापेक्षा प्रिय मानतो. तो जन्मभूमीला आपली आई मानतो. तिचा सन्मान आणि अभिमानाचे रक्षण करण्यासाठी तो आपला जीव धोक्यात घालू शकतो. प्रत्येक भारतीय सैनिक प्रेमाने भरलेला आहे. ती शौर्याची खरी मूर्ती आहे. धैर्य आणि त्याग त्याच्या रक्तात आहेत. तो देशाची सेवा करण्यासाठी घर, नातेवाईकांपासून दूर निघून जातो. खरोखर, आपल्या सैनिकांमुळे शत्रू देशाकडे डोळा वर करूनही पाहू शकत नाही. सत्य हे आहे की भारतीय सैनिक त्याच्या उत्कृष्ट गुणांनी जगभर प्रसिद्ध आहे.
बालाजी डुबूकवाड भारत देशाची 15 वर्षे सेवा केली व वयाच्या 34 व्यां वर्षी 18 डिसेंबर 2021 रोजी जम्मू काश्मिर येथे कुपवाडा याठिकाणी सिमेवरती देशसेवेसाठी सुरक्षा बलामधे कर्तव्यावर तैनात असताना विरमरन आले.
आओ झुक कर सलाम करे उनको,
जिनके हिस्से में ये मुकाम आता है,
खुशनसीब होता है वो खून,
जो देश के काम आता है,
देश के शहीदों को शत् शत् नमन !
जय हिंद जय महाराष्ट्र ! सैनिक हे सदैव अभिनंदन कौतुकस पात्र असतात म्हणूनच खरोखर, आपले सैनिक आपला अभिमान आहेत हे वास्तव असल्याने स्वर्गीय पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ‘जय जवान, जय किसान’ असा नारा दिला व अन्नदाता शेतकरी व देशाचा रक्षक सैनिक यांचा सन्मान केला या माताती बालाजी डुबुकवाड यांच्या सारखं रत्न जन्माला आलं हाच या मातीचा गौरव आणि नुसतं जन्मला आलं असं नाही तर याच मातीच्या रक्षणासाठी शहिद होणारे डुबुकवाड हे नांदेडचे सुपुत्र आहेत हि भविष्यातील पिढीला प्रेरणादायी बाब आहे अशा महान विभुती शत : शत : नमन
माधव गोटमवाड
दैनिक चालू वार्ता कंधार तालुका प्रतिनीधी
मो -8379848078