दैनिक चालू वार्त्ता वृत्तसेवा –
मनाच्याच गुंत्यातून मनाच्या भावविश्वात
काव्यप्रतिभा म्हणेल तसे, केले त्याने लेखनात !
कधी कधी चुकून जरा, पत्यांच्या बंगल्यात
अचानक कधी कसा, मराठी बाण्याच्या सामन्यात !
चर्चा तर होणारच, चारचौघी असताना
आमने सामने तेव्हा ठाकले गुड न्यूज सांगताना !
कधी लिहिला गोंधळ जागर पोवाड्यातही ओतले अश्रु
गझला वाचतांना पाहिले त्यांचेच ओघळणारे अश्रु !
अध्यात्म्याच्या वाटेवर त्याला, आनंदू कैवल्याचे चांदणे
विरहगीत लिहीताना का शब्दांचेच मग थांबणे ?
हे प्रतिभे तू म्हणशील तसे, रचिल्या हो कविता
गुंत्यातून भावविश्वात शब्दांनांच संभ्रम होता !
नकोच कुठले विश्व अता नको अनुभवही नव नवा
आजकाल लिहिताना, तरी कवितेत असतो विषय नवा !
पात्र असतानाही तो टीकेस मात्र पात्र झाला
तो आणि कविता यांचा सरिता – सागर संगम झाला !
कवी मनाच्या कवीची अजून वाटचाल सुरुच आहे
एखादी सुंदर झु.. ळूक, रोजच व्यक्त होत आहे !
®️ सुनील शरद चिटणीस
श्रीवर्धन – रायगड
१० नोव्हेंबर २०२२