दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी दि. 28 :- आलूर येथील मन्याड नदी नाला खोलीकरण व आवश्यक ठिकाणी पूल बांधणी बंधारा करून गावामध्ये पाणी न येऊ देणे,व शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मन्याड नदी च्या पाण्यामुळे नुकसान न होऊ देणे याकरता जिल्हाअधिकारी अभिजीत राऊत यांनी व त्या विभागाचे संबंधित अधिकारी पाहणी करून आलुर गावातील गावकऱ्यांना आश्वासन दिले.
मन्याड नदी खोलीकरण जास्त नसल्यामुळे पावसाचं पाणी व नदीचे पाणी जास्त प्रवाह होत नसल्यामुळे पाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये व गावामध्ये येत आहे.या पाण्याला रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर व त्यांची टीम प्रत्यक्ष पाहणी करून आलुर गावांमध्ये भेट देऊन शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना आश्वासन दिले व येत्या उन्हाळ्यामध्ये काम चालू करण्यात येईल व यापुढे गावकऱ्यांना व शेतकऱ्यांना याचा त्रास कायमचा होणार नाही असे आश्वासन अभिजीत राऊत यांनी दिले.आवश्यक ठिकाणी बंधारे,व खोलीकरण केल्यामुळे पाण्याचा प्रवाह जोरात नदीच्या वाटे जाईल यामुळे शेतकऱ्यांना त्रास होणार नाही व पिकाचे नुकसान होणार नाही व नदी ओलांडून पाण्यामध्ये पोहोत,जिव मुठीत धरून शेतकरी आपल्या पिकाच संरक्षण करण्यासाठी जात होते आता या पुलामुळे शेतकऱ्यांना पाण्यामधून जाण्याची गरज नाही.गावातील नागरिक व शेतकरी यांनी थेट जिल्हाअधिकारी यांना भेटुण आपली समस्या मांडली त्याची दखल घेऊन आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आलुर येथे येऊच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष येऊन पाहणी केल्यामुळे व आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.