दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : परताव्यापोटी दिल्या जाणाऱ्या भल्या मोठ्या रकमांच्या अमिषाला बळी पडलेल्या गुंतवणूक दारांची संख्या सुमारे ३०० च्या आसपास असून या घोटाळ्याची फाईल आता ईडीने ऊजागर केली आहे.
दरम्यान या घोटाळ्यात लिप्त परभणीच्या एका माजी नगराध्यक्षांचं नाव लिप्त असल्याचं सुत्रांकडून सांगण्यात आले आहे. तथापि ‘ते’ नगराध्यक्ष नेमके कोण असावेत, याची चर्चा मात्र चवीने चर्चिली जात आहे. अधिक चौकशी केली असता या घोटाळ्यात काही माजी नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधींचे नातेवाईक आदींची नावे लिप्त असल्याचे समजते. ईडीच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात प्रचंड खळबळ माजली जाणे स्वाभाविक आहे. या बहुचर्चित घोटाळ्यामुळे गेली कित्येक वर्षे सर्वदूर परिचित व “जगात जर्मनी अन् भारतात परभणी” म्हणून तिच्याकडे बघितले जातेय तो निजामकालीन परभणी जिल्हा पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर आला आहे एवढे मात्र खरे.
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोअर (डीएम्आयसी) प्रोजेक्ट मध्ये आंबटित केलेल्या शेतजमिनींचा मोबदला म्हणून कोट्यावधींची या रकमा शेतकऱ्यांना मिळाल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत संतोष राठोड याने शक्कल लढवत ३० ते ७० टक्के परतावा देणारी ३०:३० ही योजना ही योजना जाहीर केली. एखाद्यानं भररस्त्यात उभा राहून वर आकाशाकडे बोट दाखवले अन् आभाळ फाटले म्हणून सांगितले तर क्षणात आकाशाकडे पहाणाऱ्यांची भली मोठी वर्दळ रस्त्यावर जमा झाली, ज्यामुळे वाहतूक तर खोळंबलीच शिवाय कित्येकांना आघात ही झाले. सांगणारा माणूस कोण, कुठला, काय करतो, तो जे सांगतोय ते खरे असू शकेल का, किंवा ते शक्य आहे का, याची कोणतीही शहानिशा न करता किंवा त्यांचे काय दुष्परिणाम होऊ शकतील, याचा कोणताही आगापिछा न बघताच अशाप्रकारे पाऊल उचलणाऱ्यांची काही कमी नाहीय. तद्वतच संतोष राठोड ने जाहीर केलेली योजना कितपत खरी ठरली जाईल, आपण गुंतवलेल्या रकमा व त्यापोटी मिळणारा घोषित परतावा खरोखरंच आपल्याला मिळू शकेल का, कोण, कुठून आलेल्या व स्वार्थाने पछाडलेल्या त्या संतोष राठोडवर विश्वास ठेऊन अमिषाला जे जे बळी पडले, ते तर पूरते अटकले गेलेच शिवाय अन्यजणांनाही त्यात फसवण्यास उद्युक्त झाले. खरं-खोटं याची कोणतीही शहानिशा न करता किंवा विश्वासाला तडा जाईल असे कृत्य करण्यास धावणाऱ्या ची संख्या येथे मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचाच परिपाक म्हणून अशा फसव्या योजनांना खुलेआम खतपाणी घातले जाते ज्यामध्ये कित्येकांचं आर्थिक नुकसान झालेलं असतं. विवेक गोयंका सारख्या सुप्रसिद्ध उद्योगपतीने लाखो-करोडो लोकांना गंडवण्याचे काम केले आहे. त्याचेच फलित म्हणून तो मागील २० वर्षांपासून जेलमध्ये सडत आहे.
दरम्यान संतोष राठोड घ्या अमिषाला बळी पडून ज्यांनी ज्यांनी या योजनेत रकमा गुंतलेल्या त्यात शेतकरी, व्यापारी, राजकीय नेते, नोकरदार, लोकप्रतिनिधींचे नातेवाईक आदींना सुरुवातीला काही दिवस दिलेला परतावाच मुळी अमिषाला खतपाणी घालणारा ठरला गेला. आवळा देऊन भोपळा काढणारी ही फसवी ओलाद थोडा कालावधी अमिषाचं गाजर दाखवून नंतर आपोआपच पसार होतात, हा देशातला ज्वलंत इतिहास आहे.
नंतर शोधाशोध, पोलिसांत जाणे, तक्रारी गुदरणे, समदुःखींना गोळा करुन आवाज उठविणे, त्याविरोधात आवाज उठवून आक्रोश करणे, न्यायासाठी विविध मार्ग चोखाळणे, प्रसंगी कित्येकांचे आर्थिक व मानवीय नुकसान भोगणे हे सर्व पीडित उपद्व्याप त्यांनी आपल्या पाठीशी आणि तेही आपलेच पैसे घेऊन लावलेले असतात. हे विसरुन चालणार नाही. तद्वत याप्रकरणी सुध्दा पोलिसांतील तक्रारींच्या अनुषंगाने ईडीने सुरु केलेली कारवाई होणे हे क्रमप्राप्तच होते. त्यातून होणाऱ्या चौकशा, निर्माण घोटाळे, लिप्त व्यक्तींची नावे समोर येणे, त्यांची उकल होणे या सर्व प्रक्रियेला बराच कालावधी लागला जाईल यात शंकाच नाही. तथापि लिप्त व्यक्ती नामचिन असल्यास नियोजित चौकशीला मी अडथळे निर्माण केले जाण्याची प्रारंभिक शक्यता कालांतराने धूसरही बनली जाईल तो भाग वेगळा परंतु या घोटाळ्याच्या निमित्ताने का होईना परभणी जिल्हा पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर आला आहे, हे कोणालाच नाकारुन चालणार नाही. शिवाय यात लिप्त ‘ते’ माजी नगराध्यक्ष व नगरसेवक कोण असावेत, याची चर्चा मात्र चर्चिली जाणार यात कोणताही संदेह नाही.