दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) प्रतिनिधी: नजीकच्या ग्रा.पं. बोरखेडी,
बांबर्डा येथे गेल्या दोन महिन्यापासून तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याने नागरिकांनी टाहो फोडत माजी आ.अमर काळे सह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाणीटंचाईची समस्या सोडण्याची मागणी केली आहे याबाबत असे की, बोरखेडी गावाचा पाणीपुरवठा स्थायी नळ योजनेच्या पाणीपुरवठा विहिरीतून जुलै ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत सोडल्या जातो पाणी अत्यल्प झाल्यावर डिसेंबर महिन्यापासून कारंजा(घा)तालुक्यातील सारवाडी येथील नवीन तयार केलेल्या फिल्टर प्लांट मधून सुरू होतो पण तो अद्यापही सुरू झालेला नाही त्याबाबतच्या तक्रारी देऊनही संबंधित विभागाने निविदा काढल्या नाही त्यामुळे पाणीटंचाईचे भीषण चटके रहिवासी नागरिकांना सोसावे लागत आहे याबाबत संबंधित ग्रामसेवक पठाण यांनी अद्याप पावेतो सकारात्मक पावले उचलले नाही आणि तक्रारी संबंधी गावकऱ्यांचे समाधानही केले नाही त्यामुळे बोरखेडी, बांबर्डा येथील नागरिकांनी काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाणीटंचाईची समस्या निकाली काढण्याची मागणी ग्रा.पं.सदस्य किशोर कुंभरे,चंद्रशेखर तायवाडे यांच्यासह गावकऱ्यांनी केली आहे