दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अचलपूर) :-अचलपूर शहर हे ऐतिहासिक शहर असून आजही या शहरात अनेक पुरातन वास्तू अस्तित्वात आहेत.परंतु त्या वास्तूकडे शासनाच्या दुर्लक्षितपणामुळे ऐतिहासिक वास्तूंचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल.त्यामुळे अचलपूर शहरातील ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभागाने वेळीच पावले उचलावीत अशी मागणी अचलपूर वासियांकडून होत आहे.
अचलपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या हौद कटोरा असो वा शहरातील मालवेसपुरा स्थित परकोटा भिंत या प्राचीन वास्तू अतिशय जीर्ण झाले असून या प्राचीन वास्तूंकडे पुरातत्त्व विभागाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.अचलपूर शहरात अनेक ठिकाणी उद्यानाच्या संवर्धन व सुशोभीकरणाबाबत केंद्र व राज्य शासन पुरातत्व विभागाच्या उदासीनतेमुळे या पुरातन ऐतिहासिक वास्तू अनेक ठिकाणी गायब होतांना दिसत आहे.
प्राप्त माहितीनुसार,अचलपूर शहरातील बिलालपुरा,चावलमंडी,मालवेसपुरा परिसरातील भव्य प्राचीन भिंतींची जीर्ण अवस्था दिसून येत आहे.एकीकडे केंद्र व राज्य सरकारने अचलपूर शहराच्या प्राचीन ऐतिहासिक वास्तूची जतन व संवर्धन करून शहराचा पर्यटन स्थळ म्हणून विकास केला गेला पाहिजे अशी मागणी आजही अचलपूर वासियांकडून होत असली तरी आतापर्यंत केंद्र व राज्य सरकारने याबाबत कोणताही ठोस प्रस्ताव अथवा निर्णय दिलेला नाही.पुरातत्त्व विभागाने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून होत असून या ऐतिहासिक वास्तूंचे सुशोभीकरण करण्याचे काम पुरातत्त्व विभाग कधी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.