दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार : संगुचीवाडी :- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० चा उस्माननगर ते कंधार मार्गामध्ये भोपाळवाडी फाट्याजवळील संगुचीवाडी वळण रस्ता (बायपास) जो जवळपास ९५% काम मे.कल्थीया इंजिनिअरिंग & कंट्रक्शन ली.अहमदाबाद गुजरात यांच्या मार्फत केले आहे.परंतू सदरील रस्त्याचे काम कंपनीने मागील दिड महिन्यांपासून बंद ठेवलेले आहे.काम पुर्ण न केल्यामुळे सदरील वळण रस्ता चालू करण्यात आला नाही जेणे करून सर्व वाहने हे छत्रपती श्री संभाजी महाराज चौक भोपाळवाडी फाट्या येथूनच जात आहेत.त्यामुळे सदरील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात धूळीचे थर साचून येथील व्यापाऱ्यांचे व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.त्यांना खूप नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच सदरील कंपनीने संगुचीवाडी वळण रस्तावर मातीचे ढिगारे टाकून कोणत्याही प्रकारची सुचना फलक लावलेला नाही.त्यामुळे तेथे दररोज अपघात होत आहेत.तसेच सदरील कंपनीस व्यापार्यांनी वारंवार या रस्त्यावर पाणी टाकण्याबाबत सुचना केल्या असता त्यास कोणताही प्रतिसाद कंपनीने दिला नाही.तरी सदरील कंपनीचे बिल रस्ता पुर्ण झाल्याशिवाय देयक देऊ नये सदरील प्रकरणाची तात्काळ पाहणी व चौकशी करून वळण रस्ताचे काम पुर्ण करून वळण रस्ता चालू करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालय, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, सव डीवीजनल कार्यालय नांदेड, उपविभागीय अधिकारी कंधार यांना श्री.शंकर माणिकराव पाटील घोरबांड व श्री.बालाजी पांडुरंग बोईनवाड आणि छत्रपती संभाजी महाराज चौक येथील व्यापाऱ्यांनी निवेदन देऊन वळण रस्ता (बायपास) चालू करण्याची मागणी केली आहे.