दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ झाल्याचं आढळून आलं आहे. हाच प्रश्न आज काही आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडला आहे. यावेळी आमदार बच्चू कडूंनी एक अजब मागणी केली आहे.
आमदार प्रताप सरनाईक, अतुल भातखळकर, सुनील टिंगरे यांनी भटक्या कुत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी बच्चू कडू यांनी या भटक्या कुत्र्यांना आसामला पाठवण्यात यावं, असा सल्ला दिला आहे. एखाद्या शहरामध्ये तसा प्रयोग करण्यात यावा, असंही बच्चू कडू यांनी सुचवलं आहे.
बच्चू कडू म्हणाले, “खरंतर भटक्या कुत्र्यांवर एक सोपा इलाज आहे. पाळीव कुत्रे रस्त्यावर येत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. फक्त समिती नेमण्यापेक्षा कृती योजना जाहीर करायला पाहिजे. एखाद्या शहरात तसा प्रयोग करण्यात यायला हवा. ”
बच्चू कडू पुढे म्हणाले, “रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना उचलून आसाममध्ये नेऊन टाका. आसाममध्ये कुत्र्यांना किंमत आहे. आठ-नऊ हजारांना तिथं कुत्री विकली जातात. आम्हाला गुवाहाटीला गेल्यावर कळलं की आपल्याकडे जसं बोकडाचं मांस खातात, तसं तिकडं कुत्र्याचं मांस खातात. त्यामुळे तिथल्या व्यापाऱ्याला बोलावून त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.