दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर-
मागील सात आठ वर्षांपासून देगलूर व परिसरात शेतकरी, शेतमजूर व तरूणांसाठी सातत्यपूर्ण काम करणारे, मोर्चे, आंदोलन व निवेदनाद्वारे शोषित व वंचित घटकांचे प्रश्न शासन व प्रशासनापर्यंत पोहचवून ते सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते तथा शेतकरी नेते कैलास येसगे कावळगावकर यांनी तेलंगनाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला.
मागील 9 वर्षात के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगनातील शेतकरी, शेतमजूर व दलित यांच्या आयुष्याचा कायापालट केला. विशेषतः शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज, मशागतीसाठी एकरी 10 हजार रूपये, सिंचनाच्या सुविधा, मागासवर्गीय तरूणांना उद्योगासाठी 10 लाख रूपये अनुदान रक्कम अशा सेवा सुविधा देऊन तेलंगना राज्याचा सर्वांगीण विकास साधला. त्यांच्या कार्याचा आदर्श घेत आपल्या भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठीच भारत राष्ट्र समितीत प्रवेश करत असल्याचे कैलास येसगे यांनी सांगितले.