दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : अंजनगाव सुर्जी शहरातील काठीपुरा नजीक नवगज्जी प्लॉटच्या मागील बाजूस नव्याने झालेल्या बहिरे ले-आऊट मध्ये स्थापन असलेल्या मातामाय देवी मंदिराची काही समाजकंटकाद्वारे विटंबना करण्यात आल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली असता नागरिकांनी समाजकंटकांना तात्काळ अटक करा अशी मागणी करण्यात आली.
शहरात कोणत्याही प्रकारचा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न व्हावा याकरिता शेकडो नागरिकांनी उपविभागीय अधिकारी सचिंद्र शिंदे यांना निवेदनाद्वारे आरोपींना अटक करण्याची मागणी केली.जर २४ तासाच्या आत पोलीस प्रशासनाने आरोपींना अटक करून त्यांच्यावर कार्यवाही न केल्यास पुढील अनुचित प्रकाराला प्रशासन जबाबदार राहणार असे नागरिकांनी निवेदनाद्वारे यावेळी म्हटले.
निवेदन देतेवेळी मुन्ना इसोकार,रवींद्र दवे,आशुतोष भिताडे,गणेश अग्रवाल,विनोद पायघन,निलेश आवंडकर,विनोद रेखाते,राजू गिरी,सागर काळपांडे,पवन वैरागडे,आदीसह शेकडो नागरिक उपस्थित होते.