दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
काल झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मंठा तालुक्यातील राजकारण्यांनी भरपुर बोध घ्यायला हवा कारण आपल्यासाठी गाव पातळीवर अनेक कार्यकर्ते गटातटाचे राजकारण करून स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून आपल्या पाठीशी उभेट राहून आपली बाजू लावून धरतात ही गोष्ट लक्षात ठेवुन राजकारण केले पाहिजे, हल्ली परतूरच्या राजकारणात काही गोष्टी समोर येत आहेत एकतर्फी कुस्ती होत असल्यामुळे, तू जिंकणारा पहिलवान आहेस परंतु त्याला कुठल्यातरी अडचणीत घेऊन तो या कुस्ती त पडला पाहिजे अशीच कुस्ती खेळ अशा प्रकारचे चित्र परतुर मंठा तालुक्यात निर्माण झाले आहे, आष्टी व मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मी असे म्हणेल कार्यकर्त्यांचा बळी दिला, कारण परतुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वपक्षीय नेते एकत्रित आले,याचा परिणाम येथील निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांना भोगावा लागला, खरे तर काही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र झाले का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला मग विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कोण ताकद लावणार का नाही असे चित्र सुद्धा दिसत आहे, परंतु ज्या ज्या वेळी तालुका सम्राट यांनी ताकद दाखवायचा प्रयत्न केला त्यावेळी गर्वहरण झालेला आहे, मागच्या काही वर्षात बोराडे विरुद्ध आकात, बोराडे यांची एवढी चलती होती की त्यावेळी कोणालाच वाटत नव्हते बोराडे यांचा साम्राज्य संपेल परंतु कालांतराने आकात यांच्या नेतृत्वाखाली संपुष्टात आले होते, त्यानंतर असे वाटू लागले आता आकात यांना तोड नाही, नंतर आणि ते ही संपले, आमदार बबन लोणीकर यांचा कार्यकाळ चालू झाला हा कार्यकाळ सुद्धा संपणार, लोणीकर यांना उतरती कळा लागणार,कारण मागे घडले ते समोर घडणार याबद्दल कोणाचाही मनात शंका यायला नको, दैनिक चालु वार्ताशी बोलताना सोळंके यांनी मनातील भावना व्यक्त करत कृषी उत्पन्न बाजार समिती परतुर,मंठा,आष्टी, नवनिर्वाचित संचालक मंडळाला खूप खूप शुभेच्छा, तसेच नेत्यांच्या जीवावर उभे न राहता बिन भरोसे निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना आपण स्वतःच्या जीवावर ताकतीने निवडणूक लढवली त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन.