दैनिक चालु वार्ता अंबड प्रतिनिधी -ज्ञानेश्वर साळुंके
जालना जिल्ह्यातील नावाजलेल कृषी उत्पन्न बाजार समिती
पैकीे एक अंबड कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणुकीत महाविकास आघाडीत पडलेली फुटी मुळे काँग्रेस तसेच शिवसेना गट ऐनवेळी भाजप महायुतीमध्ये गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपामध्ये
अटीतटीचा चर्चा सर्वत्र सुरू होती मात्र महाविकास आघाडीचे फूटी पडल्याने ही निवडणूक भाजपा महायुतीसाठी सोपी झाल्याने त्यांना 18 जागे पैकी 15 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसच्या 35 वर्षापासून एक हाती सत्ता संपुष्टात आणली आहेत अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीवर मागील 35 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता कृषी उत्पन्न बाजार समितीत अंबड येथे होती मात्र माजी मंत्री आमदार राजेश टोपे यांनी उमेदवाराला द्यावा आणि ते निवडून यावा या परंपरेला या निवडणुकीत छेद बसला आहे मात्र 18 संचालक आ पैकी केवळ 03 संचालक हे महाविकास आघाडीच्या निवडणुकीत आले आहेत बाकी सर्व 15 संचालक भाजपचे महायुतीच्या निवडणुकीत आल्याने 35 वर्षानंतर भाजपच्या सत्तांतर झाले आहे तसेच समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाडगे यांच्या मोठे योगदान या निवडणुकीत होतं यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपा ला ताकद चांगलीच वाढली होती आमदार नारायण कुचे साहेब तसेच भाजपाचे सरचिटणीस अवधूत नाना खटके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांनी हे निवडणुकी एक हाती जिंकली व राष्ट्रवादी काँग्रेस विरोधक ला
एक होऊन भाजपा ना दिले बळ बदनापूर अंबड विधानसभा मतदार आमदार नारायण कुचे साहेब यांनी महाविकास आघाडीत पडलेल्या फुटीचा चांगला च फायदा घेतला तसेच शिवसेना च्या माजी मंत्री अर्जुन भाऊ खोतकर माजी आमदार विलास बापू खरात हिकमत दादा उढान केदार दादा कुलकर्णी या सर्व समितीने निवडणूक लढवण्यास तसेच निवडणूक होईपर्यंत गावोगावी जाऊन मतदारांना भेट
दिल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सवा आला आणि 35 वर्षानंतर अंबड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सत्तांतर घडून आणलं आणि महाविकास आघाडीचे 15 उमेदवारांचा पराभव झाला मागील अनेक वर्षापासून अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ताब्यात होती मात्र आमदार टोपे यांनी दिलेल्या उमेदवारीचे अंतिम असतात ते सतत त्यांनी जुन्या चेहऱ्यांना संधी देत त्यांना एक हाती सत्ता कायम टिकून ठेवली होती या वेळेस महाविकास आघाडीमध्ये नाराजी होती मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार टोपे यांनी दिलेल्या उमेदवारीचे अंतिम असतात ते सतत त्यांनी जुन्या चेहऱ्यांना संधी देत त्यांना एक हाती सत्ता कायम ठेवली होती मात्र या वेळेस महाविकास आघाडीमध्ये नाराजी संख्या अधिक असल्याने ही निवडणूक भाजपा महायुतीसाठी सोपी ठरणार हे निश्चित होते तीन उमेदवाराला पडलेले प्रत्येकी 390 मतदान अंबड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्वसाधारण मतदार संघाचे महाविकास आघाडीचे विलास शिंदे भैय्यासाहेब हातोडे तसंच भाजपाचे शिवाजी शिंदे व राष्ट्रवादी चे भैय्यासाहेब हातोडे या दोन्ही उमेदवाराला विजय घोषित केले