दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेड : – यावर्षी शेतीमाला भाव नसल्याने शेतकरी विविध समस्यांच्या गर्तेत सापडलेला दिसून येत आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना आशा होती कि कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे , शेतीमालाला किमान आधारभूत भाव मिळणे अन्नधान्य, गळीत धान्य, कडधान्य, भाजीपाला यासाठी मुलभूत सुविधा व योग्य भाव मिळणे पण तसे झाले नाही तर उलट शेतीतील ऊस , हळद , कापूस, सोयाबीन, तुरीसह अन्य शेतीतील पिके शेतकऱ्यांना कवडीमोलाने खरीपच्या पेरणीसाठी व्यापाऱ्यांने मागेल त्या किंमतीला द्यावी लागली कृषी बियाणे खते औषधे किटकनाशके यांचा भाव जास्त तर शेतीतील बळीराजाने पिकवलेला माल कवडीमोल का ? असा सवाल बळीराजाच्या तोंडुन ऐकावयास मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या मनात सरकारच्या विरूद्ध तीव्र संताप पहावयास मिळत आहे .
मृग नक्षत्र संपत आले तरी पण पावसाचा तिळमात्र पताच नसल्याने शेतकऱ्यांने कवडीमोलाने शेतीमाल विकुन सावकारी कर्ज काढून घरात खते बियाणे आणुन ठेवले असुन बळीराजा पेरणीसाठी सज्ज झाले आहे.
शेतामध्ये अनेक ठिकाणी पाणी टंचाई सह गुरांना चाऱ्यांचा पण प्रश्न भेडसावत असुन चारा टंचाई पण पहावयास मिळत आहे शेळ्या मेंढ्या पण फिरवायला चारा नसल्याने मेंढपाळांचे बेहाल उठले आहे. पेरणीसह विविध समस्यांनी शेतकरी चिंताग्रस्त दिसुन येत आहे