दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) थोर संतांची भूमी व जुळे शहर म्हणून अंजनगाव सुर्जी ची ओळख आहे.परंतु ज्या भूमीतून जगभरातील लोकांना साफ-सफाईचा संदेश देणारे कर्मयोगी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे जनक म्हणून जगभर ओळखले जातात.ते कर्मयोगी संत गाडगे बाबा,संत रूपलाल बाबा याच अंजनगाव सुर्जी भूमीतील असून शहानूर नदी मात्र;प्रदुषणाने वेढलेली आहे.त्यामुळे प्रशासन अशा थोर संताची अवहेलना तर करीत नाही ना? असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे.
एकीकडे स्वच्छता अभियानावर शासन करोडो रुपये खर्च करीत असताना दुसरीकडे अंजनगाव सुर्जी शहरातून वाहणारी जीवनदायीनी शहानुर नदी मात्र प्रदूषणाने वेढलेली आहे.शहरातील सांडपाणी नदीपात्रात एकाच ठिकाणी थांबल्यामुळे दुर्गंधी,डास,माश्या,चिलटे यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे आणि त्या साचलेल्या पाण्यात केर-कचरा,प्लास्टिक बॉटल,काचेच्या बॉटल,प्लास्टिक पिशव्या,पोते दिसून आढळत असताना याचा परिणाम निव्वळ जनतेच्या आरोग्यावर झालेला नसून नदीचे आरोग्यही त्यामुळे धोक्यात आल्याने पर्यावरणाला सुद्धा झळ पोहचली आहे.मात्र;प्रशासन उघड्या डोळ्यांनी जनजागृतीवर दुर्लक्ष करीत आहे.
काही दिवसांपूर्वी तर शहानुर नदी पात्रात चक्क डॉक्टरांनी जैविक वैद्यकीय कचरा टाकल्याचे निदर्शनास आले.सदर जैविक वैद्यकीय कचऱ्याची पाहणी तालुका वैद्यकीय अधिकारी,वैद्यकीय अधिकारी यांनी केल्यावर मुख्याधिकारी यांच्या निर्देशानुसार न.प.आरोग्य विभागाकडून जैविक वैद्यकीय कचरा जप्तही करण्यात आला.परंतु अधिकाऱ्यांकडून अद्यापही कारवाही गुलदस्त्यात असल्याचे दिसत असून तहसीलदार मात्र गप्प बसले आहेत.
अंजनगाव सुर्जी शहरातून वाहणारी शहानुर नदी समवेत येथील नागरिक प्रदूषणमुक्त श्वास घेणार का? याकडे नागरिकांचे विशेष लक्ष वेधले आहे.