दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती : दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा वीरशैव कंकय्या चर्मकार समाज विकास संस्थे तर्फे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
दहावीच्या परीक्षेमध्ये महाजनपुरा येथील समीर रवी रावळे याला ८९ टक्के तर श्रावण कैलासराव सावरकर याला ८५ टक्के गुण मिळाले.त्यामुळे संस्थेचे संघटक तथा समाज सेवक सचिन वाटकर यांचे हस्ते गुण गौरव करण्यात आला.
या विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी युवा कार्यकर्ते अरविंद सावरकर,बाला रावेरकर,गणेश मेशकर,अजिंक्य सावरकर,विनोद कोठेकर,हनुमंत विजयकर,नारायण चव्हाण,रोहित गुजर,कैलास सावरकर,रवी रावळे,धीरज अर्जापुरे,शुभम कटिस्कर,अनिल सावरकर,किशोर कोठेकर,नरेश गोरे,पुरुषोत्तम गायकवाड,विकी वाटकर,अरुण चव्हाण आदी चर्मकार बांधव यावेळी उपस्थित होते.