दै.चालू वार्ता
प्रतिनिधी वाशिम दिनकर गडदे
वाशिम:/मौजे जयपूर येथे दिनांक 14 सप्टेंबर रोजी बैलपोळा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला.
वर्षभरात शेतात राबणाऱ्या बैलाचा एकमेव सण म्हणजे अर्थात पोळा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
श्रावणातील प्रत्येक व्रत, वैकल्ये ,सण उत्सव यांना धार्मिक महत्त्व आहे.
तसे ते शास्त्रीय, व्यवहारिक, नैसर्गिक, कृषी,या दृष्टीने ते महत्त्वाचे आहेत. शेतकऱ्याचा सखा सोबती प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैला प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण महत्त्वाचा मानला जातो. श्रावण अमावस्येला पोळा साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे. श्रावण मासातला हा शेवटचा आठवड्यातला श्रावण मास आहे.
श्रावणी अमावस्येच्या दिवशी शेतकरीवर्ग पोळा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. हा सन आषाढ महिन्यात,मूळ नक्षत्र असलेल्या दिवशी किंवा. श्रावण अथवा भाद्रपद महिन्याच्या अमावस्येला साजरा करतात. महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये हा सण साजरा केला जातो मात्र परंपरा आणि मान्यता नुसार तिथी आणि वेळा भिन्न असतात या सणाचे शेतकरी वर्गात विशेष महत्त्व आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात. नागपंचमी, नारळी,पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, या सणाबरोबरच श्रावणात अमावस्येला संपूर्ण महाराष्ट्रात पोळा सण साजरा केला जातो.
बैलपोळा हा दोन खांब उभे करून त्यांना तोरण बांधून त्यांना रांगेत उभे करून त्यांना मानकरीच्या हस्ते नैवेद्य देऊन त्यांना हळद कुंकू व तांदूळ लावून लग्न समारंभाप्रमाणे बैलांची लग्न लावली जातात. नंतर एक एक बैलाची जोडी समोर जाऊन हनुमंताच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून आपापल्या घरी जातात.
खास करून सकाळपासून त्यांना नदी किंवा तळ्यावर नेऊन त्यांना अंघोळ स्नान घालतात त्यानंतर त्यांना सजवून पाठीवर जुली टाकून चांगल्या पद्धतीने सजवून त्यांना सकाळपासून घरीच खायला घालतात विशेष म्हणजे त्या दिवशी त्या बैलाला कामाला लावत नाहीत…