दिला कडक शब्दांत इशारा…
मुंबई : वेब विश्वात सध्या एका मालिकेनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. बंबई मेरी जान असे त्या मालिकेचे नाव आहे. त्यावरुन आता वेगळ्याच वादाला सुरुवात झाली आहे.सोशल मीडियावर त्याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील समोर आल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं बंबई या शब्दावर आक्षेप घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बंबई मेरी जानमधील निर्मात्यांना परखड शब्दांत इशारा दिला आहे. त्यामुळे येत्या काळात या मालिकेवरुन नवीन वाद समोर येण्याची चिन्हे दिसून आली आहेत. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला होता. त्याला अल्पावधीत मिळालेला प्रतिसादही मोठा होता. केके मेननची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेची अनेक दिवसांपासून चर्चा होती.
अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणाऱ्या या मालिकेमध्ये सत्तरीच्या काळातील मुंबईचे दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. तेव्हा मुंबईमध्ये असणारी गुन्हेगारी, गुन्हेगारी विश्वाचे धागेदोरे, वेगवेगळे गुंड, त्यांच्या टोळ्या आणि टोळीयुद्ध यावर आधारित मालिकेतून एका बड्या गुंडाची कथा उलगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांच्या हातावर नेहमीच तुरी देत सटकणाऱ्या त्या गुंडानं साऱ्या जगात आपल्या नावाची वेगळी ओळख तयार केली.
पण याची सुरुवात कशी झाली, हे सांगणारी सीरिज म्हणून ‘मुंबई मेरी जान ‘ कडे पाहावे लागणार आहे.
यासगळयात खोपकर यांनी केलेली पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांनी म्हटले आहे की, “नावात काय आहे?” असे शेक्सपियर म्हणून गेला.. परंतु, जे दिल्लीत आणि जे मुंबईत चालू आहे ते पाहता ‘नावा’तच सर्व काही आहे असे वाटते! फायदा कोणत्याही राजकीय पक्षाचा असो.. परंतु, इंग्रजांना हुसकावून लावून ७५ वर्षे झाली तरी जगाने आजही आपल्याला त्यांनीच दिलेल्या इंडिया ह्या नावाने ओळखावे ही गोष्ट बरी नाही.