पुरातत्त्व विभागाची अनास्था…
काम बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी…
समिर शिरवडकर -प्रतिनिधी
रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड मधील केंद्रीय राज्यसंरक्षि जलदुर्ग किल्ला आपल्या इतिहासाची साक्ष देत उभा आहे.रत्नागिरी तालुक्यात एकूण तीन किल्ले आहेत. पूर्णगड, रत्नदुर्ग, आणि जयगड.
काही दिवसा पासून जयगड खाडी मध्ये जे एस डब्ल्यू पोर्ट खूप मोठ्या प्रमाणात ड्रेजिंग करत आहे. या ड्रेजिंगच्या सतात्याच्या कंपनामुळे जयगड खाडी लगत असलेल्या जयगड किल्ल्याच्या बुरुज आणि तटाना मोठ- मोठाले तडे जाताना दिसत आहे. केंदिय पुरातत्व अधिकाऱ्यांना वेळो वेळी सूचना देऊन सुद्धा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. जयगड किल्ल्याचे अस्तित्व संपल्या नंतर पुरातत्व खात्याचे अधिकारी पंचनामा करण्यासाठी येणार आहेत का ? असा प्रश्न जयगड ग्रामस्थांनी आणि दुर्ग प्रेमींनी उपस्थित केला आहे.
समनधित पोर्ट च्या ड्रेजिंगच्या संदर्भात जेव्हा जे एस डब्ल्यू पोर्टचे पी.आर.ओ. यांच्याशी बोलणे झाले तेव्हा त्यांनी सांगितले की महारष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांच्या बरोबर आमचा पन्नास वर्षांचा करार झाला आहे. बंदराच्या वाडीव कमासाठी जे. एस. डब्ल्यू .पोर्ट यांना भरभरून सवलती देण्यात आलेल्या आहेत. जे. एस. डब्ल्यू च्या मला वाहू जहाज सुरक्षित पोर्ट मध्ये याव्यात म्हणून दिवस रात्र मोठ्या प्रमाणत ड्रेजिंग करत आहोत. असे सांगण्यात येते.
जे एस डब्ल्यू पोर्ट यांच्या खाडीच्या मुखा जवळ भराव आणि रात्रं दिवस चालणाऱ्या ड्रेजींगमुळे जयगड खाडीला पुराचा धोका निर्माण होऊन जीवित हानी होणार तसेच जयगड किल्ल्याची पडझड होऊन किल्ला नष्ट होण्याच्या स्थितीत आहे तो किल्ला वाचावा यासाठी काही जयगड गावातील ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत सदस्स्या सौ. देवियानी देविदास खाडे आणि जयगड खाडी बचाव कृती समितच्यावतीने मा.जिल्हाधिकारी,महारष्ट्र मेरीटाईम बोर्ड यांना ड्रेजींगचे व सुरू असणाऱ्या नवीन जेट्ठीचे काम त्वरित थांबवण्यात यावे असे पत्र देखील देण्यात आले होते जे एस डब्ल्यू पोर्ट यांच्या वाढीव बंदरासाठी व्यवसाय
वाढिसाठी जयगड खाडीच्या मुखावर भराव टाकल्यामुळे खाडीच्या पाण्याची पातळी वाढली आहे आणि पाण्याचा प्रवाह बदलून परकोट किल्ल्या मध्ये घुसून किल्ल्याची तटबंदी तुटली आहे. त्याच बरोबर आता जयगड खाडी मधील रात्रं दिवस ड्रेजींगच्या कंपनामुळे जर जयगड किल्ला पडला तर याला जबाबदार कोण जिल्हाधिकारी, पुरातत्व खाते, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड की जे. एस. डब्ल्यू. पोर्ट, असा सवाल उपस्थित होत आहे.
जयगड किल्या च्या बुरुजांना ड्रेजिंग च्या कंपणामुळे तडे जात नसून ते झाडांच्या मुळामुळे गेले आहेत,त्यासाठी ते बुरुज पाडून त्याचे नवीन बांधकाम करण्यात येईल :- श्री राज दिवेकर -केंद्रीय पुरातत्व विभाग…
एका टेम्पररी अधिकाऱ्याला आणि त्याचा अभ्यास नसणाऱ्या कर्मचाऱ्या कडून पाहणी करणे अयोग्य, आणि बुरुजांना तडे पडले ते काश्यायमुळे हे दिल्लीत बसून समजणार नाही :- दुर्ग प्रेमी -ग्रामस्थ