दैनिक चालु वार्ता
नांदुरा प्रतिनिधी
किशोर वाकोडे
पातोंडा (नांदुरा) :- दि.७ . जिगाव प्रकल्पासाठी घरावर पाणी सोडणाऱ्या ग्रामस्थांना अद्याप भूसंपादनाचा मोबदला मिळालेला नाही. या मोबदल्यासाठी ते ६ एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. उपोषणकर्त्यांची अकरा कुटुंब असून कडक उन्हात ते न्यायाची मागणी करताना दिसले.
रामभाऊ हेलगे, सुभद्राबाई ओंकार लोणकर, रघुनाथ झाल्टे, रामचंद्र रणीत, दामा सपकाळ, संध्या अशोक वाकोडे, देवचंद रामचंद्रराव रणीत, निर्मलाबाई रामचंद्र रनीत, लक्ष्मण रामचंद्र रणीत,सविता देवचंद रनित, पुरुषोत्तम वासुदेव झाल्टे, न्यायाच्या प्रतीक्षेत ही मंडळी कुटुंबासह उपोषणाला बसली आहे.