दैनिक चालु वार्ता
किनवट तालुका ग्रा, प्रतिनिधी
दशरथ आंबेकर
किनवट :- औरंगाबाद शहरातील सिडको येथे एका दलित मागासवर्गीय मातंग समाजात राहणारा कै. मनेश शेषेराव आव्हाड वय २७ वर्षे हा युवक महानगरपालिकेच्या सभाग्रहाची व्यवस्था पाहण्यासाठी महिन्यांने राहत होता.या ठिकाणी बरेच दिवसांपासून महिन्याने काम इमानदारीपूर्वक करत असताना,येथील माजी नगरसेविका खरात यांच्या कुटुंबातील मंडळीकडे या सभाग्रहाची व्यवस्थापन करण्याची जबाबदारी होती.
परंतु या ठिकाणी इमानदारीपूर्वक चोवीस तास काम करतअसताना शुल्लक कारणावरून मंगल कार्यालयातील काही वस्तू चोरीला गेल्याच्या संशयावरून कै.मनेशआव्हाड यांच्यावर संशय घेऊन खरात कुटुंबातील राजकीय वलयप्राप्त गुंडांनी त्याला दिनांक:- २० एप्रिल २०२२रोजी घरांमधून बोलावून तुला काम सांगायचे आहे,असे म्हणून त्याला सोबत घेऊन एकूणआठ ते दहा जणांनी हात पाय बांधून या गुंडांनी सांग तु चोरी केलीआहेस? मान्य कर व चोरीचे साहित्य परत करअसे म्हणून लोखंडी राड,लाकडी बांबूनी त्याला एखाद्या जनावरांप्रमाणे बेदम मारहाण करण्यातआली होती.
तर या मारहाणीचा सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ करून तो व्हीडीओ प्रसारित करण्यातआले होते.याआठ ते दहा लोकांनी त्यांना बेदम मारहाण करत असताना अखेर त्यांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर औरंगाबाद घाटी रुग्णालयात संबंधित आव्हाड यांना दाखल करून त्याठिकाणावरुन क्रूर राक्षसी गुंडांनी पळ काढलाआहे.हे प्रकरण सामाजिक माध्यमातून प्रसारित व उघड झाल्यानंतर व या प्रकरणातील दोषी माजी नगरसेविका खरात यांच्या कुटुंबातील गुंन्डांवर कायदेशीर कलमे वाढून जलदगती उच्च न्यायालयात प्रकरण चालवुन त्यांना तात्काळ फाशीवर लटकवण्यात यावे,कारण पुन्हा महाराष्ट्रातअसे दलित मातंग समाजातील युवक महिला, बांधवांवर घटना घडू नये, याची दक्षताऔरंगाबाद पोलीस प्रशासनानी यांनी घ्यावी.
अतिशय गरीबअसलेल्या कुटुंबातील त्यांच्या पत्नीला आयुक्त महानगरपालिकाऔरंगाबाद यांनी कायमस्वरूपी महानगरपालिकेमध्ये शासकीय नौकरी देण्यात यावी व विशेष बाब म्हणून सामाजिक न्याय व सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाकडून तातडीची पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत त्यांना सामाजिक न्याय मंत्री, पालकमंत्रीऔरंगाबाद यांनी द्यावी. तर संबंध महाराष्ट्रामध्ये दलित मातंग समाजातील युवक, महिला,मुलेंमुलीं, बांधव यांच्यावर दररोजअन्याय,अत्याचार,खून बलात्कारअसे प्रकार वाढतचआहे.
याकडे महाविकास आघाडी सरकारमधील मुख्यमंत्री,गृहमंत्री, सामाजिक न्यायमंत्री,पालकमंत्री, राज्यमंत्री यांनी लक्ष देऊन दररोज होणाराअन्याय,अत्याचार थांबवण्यासाठी ग्रहविभाग व पोलिस प्रशासनाने तात्काळ गुन्हे दाखल करून अशी प्रकरणे जलदगती न्यायालयासमोर नेवुन दोषींवर जास्तीत जास्त फाशी,जन्मठेप होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेचे कडून संपूर्ण जिल्ह्यातसह हिमायतनगर तालुक्यात लोकशाही मार्गाने बेमुदत उग्रपणे धरणेआंदोलन, रास्तारोको अशी वेगवेगळी आंदोलने करून शासनाकडे कायदेशीर मागणी करण्यात येईल.असेही यावेळी निवेदनामध्ये मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य व गृहमंत्री,सामाजिक न्यायमंत्री यांना तहसीलदार तहसील कार्यालयामार्फत एका निवेदनाद्वारे आज दिनांक: २७/०४/२०२२ रोजी मागणी केली आहे.
या निवेदनावर लोकस्वराज आंदोलन तालुकाध्यक्ष धोंडोपंत बनसोडे,तालुका उपाध्यक्ष आनंदराव जळपते,तालुका सचिव दिगांबर गायकवाड, युवकअध्यक्ष गजानन वाघमारे,कॉम्रेड शामरावजी गुंडेकर, गंगाधर गायकवाड सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार,गोविंद गोखले तालुका उपाध्यक्ष वंचित बहुजनआघाडी,गणेश राऊत जिल्हा उपाध्यक्ष बसपासह अनेक शेकडों विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याचे सह्याआहेत.ही निवेदने नायब तहसीलदार अनिल तामसकर व भगवान कांबळे पोलीस निरीक्षक हिमायतनगरमार्फत संबंधितांस देण्यात आली आहेत.